शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आम्हास इच्छामरणाची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:05 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकरी गेल्या २७ महिन्यांपासून आंदोलन करत असून, ऐन दसºयाच्या दिवशी ज्या अवचितवाडीमध्ये समृद्धीनामक राक्षसाचे दहन केले होते. तेथील शेतकरी आता आक्रमक झाले असून, ग्रामसभा घेत थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी या शेतकºयांनी केली आहे.

ठळक मुद्दे ग्रामसभेत ठरावसमृद्धीबाधितांची राष्ट्रपतींकडे मागणी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकरी गेल्या २७ महिन्यांपासून आंदोलन करत असून, ऐन दसºयाच्या दिवशी ज्या अवचितवाडीमध्ये समृद्धीनामक राक्षसाचे दहन केले होते. तेथील शेतकरी आता आक्रमक झाले असून, ग्रामसभा घेत थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी या शेतकºयांनी केली आहे.स्वातंत्र्यपूर्वकाळापासून इगतपुरी तालुक्याने खूपच यातना सोसून राष्ट्राच्या हितावह जमिनी देण्याचं काम करून विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे येथील शेतकरी हा कधीही विकासविरोधी नाही; परंतु मुख्यमंत्र्यांनी महत्त्वकांक्षी केलेल्या समृद्धी प्रकल्पात शासनाने संपादन केलेल्या जमिनी जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अनेक महिन्यांपासून आंदोलन करत या प्रकल्पाला कधी नव्हे इतका विरोध तालुक्यातून होत आहे. विशेष बाब म्हणजे हा विरोध राजकीय नसून सर्व तरुण शेतकरी मिळून करत आहेत. या ग्रामसभेत दौलत दुभाषे, गुरुनाथ दुभाषे, गोरख हाडके, दादा कडू, हरिश्चंद्र दुभाषे, मुरलीधर दुभाषे, तुकाराम कडू, शिवराम कडू, प्रकाश कडू, कैलास दुभाषे, निवृत्ती दुभाषे, सखाराम दुभाषे, मदन बिन्नर, ज्ञानेश्वर कडू, कारभारी दुभाषे इत्यादी शेतकºयांनी ठरावावर सह्या केल्या आहेत.गेल्या दोन वर्षांपासून आम्ही शासनस्तरावर भांडत असून, आमची प्रामाणिक इच्छा आहे की, सरकारने हा प्रकल्प जरूर करावा मात्र तो भूसंपादन २०१३नुसार सर्व सोपस्कर पूर्ण करून. परंतु शासन मात्र हे करताना दिसत नाही व शेतकºयांमध्ये बुद्धिभेद करून आमच्या जमिनी कवडीमोल भावात घेत आहे. ज्या अवचितवाडी गावात रेडीरेकनरच्या भावात मोठी तफावत जाणवत आहे तर प्रचलित बाजारभाव एक कोटी रुपये असताना सर्वात कमी दर देऊन जर जमिनी घेण्यात येणार असतील तर त्यापेक्षा मरण पत्करू; परंतु जमिनी देणार नाही.- भास्कर गुंजाळ, अध्यक्ष, समृद्धीबाधित संघर्ष समिती, इगतपुरी