शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आघाडी’ झाली तरी ‘युती’ नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:01 IST

नाशिक : राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांपैकी तीन जागांवर संख्याबळानुसार शिवसेनेने उमेदवार दिले आहेत. उर्वरित ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. अर्थात, ही निवडणूक वेगळी असल्याने हा फॉर्म्युला वापरण्यात आला असला तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मात्र असा फॉर्म्युला राहणार नाही, असा निर्वाळा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देहिंदुत्व हेच राष्टÑीयत्व मानून शिवसेना काम करतेकर्नाटकातील मराठी भाषिकांना आवाहन

उद्धव ठाकरे : फॉर्म्युला विधान परिषदेपुरताच; रिफायनरीचा प्रकल्प विदर्भात नेण्याचा सल्ला

नाशिक : राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांपैकी तीन जागांवर संख्याबळानुसार शिवसेनेने उमेदवार दिले आहेत. उर्वरित ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. अर्थात, ही निवडणूक वेगळी असल्याने हा फॉर्म्युला वापरण्यात आला असला तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मात्र असा फॉर्म्युला राहणार नाही, असा निर्वाळा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. याशिवाय भाजपा व सेना स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याने कॉँग्रेस आणि राष्टÑवादीला उकळ्या फुटल्या म्हणून ते एकत्र आले असले तरी शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्टÑाचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याने आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे; मात्र विदर्भातील आमदारांची मागणी असल्याने हा प्रकल्प तेथे करा, असा सल्लाही त्यांनी दिला.विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यात निवडणूक होत असून, ज्या ठिकाणी शिवसेनेचे मतदार कागदावर जास्त दिसत आहेत आणि जिंकण्याची शक्यता आहे, अशा तीन ठिकाणी पक्षाने उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांना मैत्री, ऋणानुबंध आणि नातेसंबंधांचा वापर करून मते मिळवण्याचे देखील अधिकार आहेत. ज्याठिकाणी पक्षाने उमेदवार उभे केलेले नाही त्याठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. अर्थात, ही निवडणूक वेगळी असते, त्यात पक्षाची सदस्यसंख्या निश्चित असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा किंवा विधानसभेत असा निर्णय घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी सार्वत्रिक निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय हा पक्षाच्या राष्टÑीय कार्यकारिणीने घेतला आहे, त्यात बदल होणार नाही असे स्पष्ट करून ठाकरे यांनी पंधरा वर्षे सत्तेत राहून एकमेकांशी भांडण करणाऱ्या अगदी मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा झाल्याने ते फाईलींवर सही करीत नाही म्हणणारे एकत्र आले आहेत. शिवसेना आणि भाजपा वेगळे लढणार असल्याने त्यांना मतविभागणीचा फायदा होईल असे वाटते आहे. मात्र, गेली ६५ वर्षे त्यांचा कारभार जनतेला माहिती आहे, त्यामुळे त्यांना साथ मिळणार नाही, असेही ते म्हणाले.नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याने आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे. परंतु देशात समुद्रकिनारा नसलेल्या सात ठिकाणी अशा प्रकारचे रिफायनरी कारखाने आहेत. त्यामुळे कोकणात प्रकल्प सुरू करण्याचा संबंध येत नाही. मुळात भाजपाचे आमदार देशमुख यांनी माझी भेट घेऊन हा प्रकल्प विदर्भात नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या पक्षाच्या अन्य आमदारांनीदेखील मागणी केली असल्याने हा प्रकल्प विदर्भात न्यावा, असा सल्ला ठाकरे यांनी दिला. विदर्भाचा विकास करू असे म्हणून विकास होणार नाही, तर तेथे अशाप्रकारचे उद्योग आणून विकास केला पाहिजे असेही ते म्हणाले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मिळालेला जामीन आणि भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मिळालेली क्लीन चीट यावर मात्र ठाकरे बोलले नाहीत. जे घडले ते सर्वांसमोर आहे, त्यात काय भूमिका असणार, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.यावेळी खासदार संजय राऊत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, रवींद्र मिर्लेकर, भाऊसाहेब चौधरी, दत्ता गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.कर्नाटकातील मराठी भाषिकांना आवाहनकर्नाटक निवडणुकांबाबत बोलताना नावातच कर नाटक आहे, त्यामुळे काय बोलायचे अशी शाब्दिक कोटी करून ठाकरे यांनी कर्नाटकच्या सीमाभागातील मराठी मतदारांनी मतभेद न बाळगता एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.वनगा यांना उमेदवारी देण्याची तयारीडहाणू येथील भाजपाचे माजी खासदार चिंतमन वनगा यांच्या कुटुंबीयांनी भाजपाने दिलेल्या वागणुकीमुळे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आदिवासी भागात हिंदुत्व रुजवणाºया वनगा कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना उभी राहील. वनगा यांच्या मुलांपैकी कोणी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी करण्याची तयारी दर्शविल्यास शिवसेना त्यांच्याबरोबर राहील, असेही ठाकरे म्हणाले.मोदींना रजनीकांत घाबरतोतेल रिफायनरीचा प्रकल्प समुद्रकिनारीच असावा म्हणून विदर्भात नेता येत नसेल तर नरेंद्र मोदींना सांगा ते पाच मिनिटांत विदर्भात समुद्र आणतील, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली. अलीकडे तर रजनीकांतही मोदींना घाबरतो असे सांगून त्यांनी त्यावरही कळस केला. अर्थात, मी गमतीने म्हणतोय नाहीतर उद्या माझ्यात आणि रजनीकांतमध्ये वाद व्हायचा असेही ते मिश्कीलपणे म्हणाले. रिफायनरी कारखाना समुद्रकिनाºयाशिवाय होऊ शकत नाही असे मुख्यमंत्र्यांचे मत असेल तर त्यावर कार्यशाळा घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

...तर आम्ही शत्रू आहोतहिंदुत्व हेच राष्टÑीयत्व मानून शिवसेना काम करते आणि समाजसेवाही करते. परंतु जर शिवसेना ही क्रमांक एकचा शत्रू असे भाजपा म्हणत असेल तर जनतेनेच त्याचा विचार केला पाहिजे, असे ठाकरे यांनी सांगितले.