शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘आघाडी’ झाली तरी ‘युती’ नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:01 IST

नाशिक : राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांपैकी तीन जागांवर संख्याबळानुसार शिवसेनेने उमेदवार दिले आहेत. उर्वरित ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. अर्थात, ही निवडणूक वेगळी असल्याने हा फॉर्म्युला वापरण्यात आला असला तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मात्र असा फॉर्म्युला राहणार नाही, असा निर्वाळा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देहिंदुत्व हेच राष्टÑीयत्व मानून शिवसेना काम करतेकर्नाटकातील मराठी भाषिकांना आवाहन

उद्धव ठाकरे : फॉर्म्युला विधान परिषदेपुरताच; रिफायनरीचा प्रकल्प विदर्भात नेण्याचा सल्ला

नाशिक : राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांपैकी तीन जागांवर संख्याबळानुसार शिवसेनेने उमेदवार दिले आहेत. उर्वरित ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. अर्थात, ही निवडणूक वेगळी असल्याने हा फॉर्म्युला वापरण्यात आला असला तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मात्र असा फॉर्म्युला राहणार नाही, असा निर्वाळा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. याशिवाय भाजपा व सेना स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याने कॉँग्रेस आणि राष्टÑवादीला उकळ्या फुटल्या म्हणून ते एकत्र आले असले तरी शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्टÑाचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याने आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे; मात्र विदर्भातील आमदारांची मागणी असल्याने हा प्रकल्प तेथे करा, असा सल्लाही त्यांनी दिला.विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यात निवडणूक होत असून, ज्या ठिकाणी शिवसेनेचे मतदार कागदावर जास्त दिसत आहेत आणि जिंकण्याची शक्यता आहे, अशा तीन ठिकाणी पक्षाने उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांना मैत्री, ऋणानुबंध आणि नातेसंबंधांचा वापर करून मते मिळवण्याचे देखील अधिकार आहेत. ज्याठिकाणी पक्षाने उमेदवार उभे केलेले नाही त्याठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. अर्थात, ही निवडणूक वेगळी असते, त्यात पक्षाची सदस्यसंख्या निश्चित असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा किंवा विधानसभेत असा निर्णय घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी सार्वत्रिक निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय हा पक्षाच्या राष्टÑीय कार्यकारिणीने घेतला आहे, त्यात बदल होणार नाही असे स्पष्ट करून ठाकरे यांनी पंधरा वर्षे सत्तेत राहून एकमेकांशी भांडण करणाऱ्या अगदी मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा झाल्याने ते फाईलींवर सही करीत नाही म्हणणारे एकत्र आले आहेत. शिवसेना आणि भाजपा वेगळे लढणार असल्याने त्यांना मतविभागणीचा फायदा होईल असे वाटते आहे. मात्र, गेली ६५ वर्षे त्यांचा कारभार जनतेला माहिती आहे, त्यामुळे त्यांना साथ मिळणार नाही, असेही ते म्हणाले.नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याने आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे. परंतु देशात समुद्रकिनारा नसलेल्या सात ठिकाणी अशा प्रकारचे रिफायनरी कारखाने आहेत. त्यामुळे कोकणात प्रकल्प सुरू करण्याचा संबंध येत नाही. मुळात भाजपाचे आमदार देशमुख यांनी माझी भेट घेऊन हा प्रकल्प विदर्भात नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या पक्षाच्या अन्य आमदारांनीदेखील मागणी केली असल्याने हा प्रकल्प विदर्भात न्यावा, असा सल्ला ठाकरे यांनी दिला. विदर्भाचा विकास करू असे म्हणून विकास होणार नाही, तर तेथे अशाप्रकारचे उद्योग आणून विकास केला पाहिजे असेही ते म्हणाले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मिळालेला जामीन आणि भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मिळालेली क्लीन चीट यावर मात्र ठाकरे बोलले नाहीत. जे घडले ते सर्वांसमोर आहे, त्यात काय भूमिका असणार, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.यावेळी खासदार संजय राऊत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, रवींद्र मिर्लेकर, भाऊसाहेब चौधरी, दत्ता गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.कर्नाटकातील मराठी भाषिकांना आवाहनकर्नाटक निवडणुकांबाबत बोलताना नावातच कर नाटक आहे, त्यामुळे काय बोलायचे अशी शाब्दिक कोटी करून ठाकरे यांनी कर्नाटकच्या सीमाभागातील मराठी मतदारांनी मतभेद न बाळगता एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.वनगा यांना उमेदवारी देण्याची तयारीडहाणू येथील भाजपाचे माजी खासदार चिंतमन वनगा यांच्या कुटुंबीयांनी भाजपाने दिलेल्या वागणुकीमुळे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आदिवासी भागात हिंदुत्व रुजवणाºया वनगा कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना उभी राहील. वनगा यांच्या मुलांपैकी कोणी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी करण्याची तयारी दर्शविल्यास शिवसेना त्यांच्याबरोबर राहील, असेही ठाकरे म्हणाले.मोदींना रजनीकांत घाबरतोतेल रिफायनरीचा प्रकल्प समुद्रकिनारीच असावा म्हणून विदर्भात नेता येत नसेल तर नरेंद्र मोदींना सांगा ते पाच मिनिटांत विदर्भात समुद्र आणतील, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली. अलीकडे तर रजनीकांतही मोदींना घाबरतो असे सांगून त्यांनी त्यावरही कळस केला. अर्थात, मी गमतीने म्हणतोय नाहीतर उद्या माझ्यात आणि रजनीकांतमध्ये वाद व्हायचा असेही ते मिश्कीलपणे म्हणाले. रिफायनरी कारखाना समुद्रकिनाºयाशिवाय होऊ शकत नाही असे मुख्यमंत्र्यांचे मत असेल तर त्यावर कार्यशाळा घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

...तर आम्ही शत्रू आहोतहिंदुत्व हेच राष्टÑीयत्व मानून शिवसेना काम करते आणि समाजसेवाही करते. परंतु जर शिवसेना ही क्रमांक एकचा शत्रू असे भाजपा म्हणत असेल तर जनतेनेच त्याचा विचार केला पाहिजे, असे ठाकरे यांनी सांगितले.