शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकारमुळेच सिंचन प्रकल्प रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:43 IST

पत्रकार परिषद : दीपिका चव्हाण यांचा आरोप सटाणा : बागलाण तालुक्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरणारे महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊन तालुका सुजलाम् सुफलाम् झाला असता मात्र आघाडी सरकारच्या काळात काढलेल्या सिंचन प्रकल्पांच्या निविदा भाजपा-सेना युतीच्या सरकारने रद्द केल्यामुळेच तीन वर्षे रखडले आणि त्याची किंमतही वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषद : दीपिका चव्हाण यांचा आरोप

सटाणा : बागलाण तालुक्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरणारे महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊन तालुका सुजलाम् सुफलाम् झाला असता मात्र आघाडी सरकारच्या काळात काढलेल्या सिंचन प्रकल्पांच्या निविदा भाजपा-सेना युतीच्या सरकारने रद्द केल्यामुळेच तीन वर्षे रखडले आणि त्याची किंमतही वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.आपण आवाज उठविल्यानंतर सरकारला जाग येऊन हरणबारी डावा कालवा आणि तळवाडे भामेर पोच कालव्यासाठी ७४ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. या दोन्ही प्रकल्पांच्या कामांना गेल्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता दिली. आघाडी सरकारच्या काळातच हरणबारी डावा कालवा ,तळवाडे भामेर पोच कालवा,केळझर चारी क्र मांक आठ व पुनंद प्रकल्पांतर्गत सुळे डाव्या कालव्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळेच या प्रकल्पांची साठ ते सत्तर टक्के कामे पूर्ण झाल्याचे स्पष्ट करून आमदार चव्हाण म्हणाल्या की, या प्रकल्पाची कामे करतांना भूसंपादनात अनेक शेतकर्यांच्या जमिनी जात असल्यामुळे विरोध झाला त्यामुळे साहजिकच शेतकर्यांची मने वळविण्यात बराच वेळ गेला.बागलाणमधील हे दोन्ही रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याकामी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीदेखील वारंवार पाठपुरावा केल्यामुळे एवढा मोठा निधी पदरात पाडून घेण्यात यश आल्याचे आमदार चव्हाण यांनी नमूद केले.