शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

आणीबाणीविरोधी कार्यकर्त्यांप्रती सरकार कृतघ्न झाल्याचा आरोप

By admin | Updated: March 4, 2017 17:20 IST

आणीबाणीला विरोध करून ख-या अर्थाने लोकशाहीची पुर्नस्थापना करणा-या कार्यकर्त्यांप्रती सरकार कृतघ्न झाल्याचा आरोप अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संघाचे उपाध्यक्ष रवींद्र कासखेडीकर यांनी केला.

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 4 -  देशात २६  जून १९७५ रोजी देशात लादण्यात आलेल्या आणीबाणी काळात मिसा कायद्याअंतर्गत हजारो कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले होते. यात समाजवादी पक्षाचे कार्येकर्ते, आनंदमार्गी व काही काँग्रसमधील कार्येकर्त्यांसह लोकतंत्र सेनानी संघाच्या कार्यकर्त्यांची कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट आहे. या काळात आणीबाणीला विरोध करून ख-या अर्थाने लोकशाहीची पुर्नस्थापना करणा-या कार्यकर्त्यांप्रती सरकार कृतघ्न झाल्याचा आरोप अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संघाचे उपाध्यक्ष रवींद्र कासखेडीकर यांनी नाशिक येथे आयोजित लोकतंत्र सेनानी संघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात केला.
 
सरकारची इच्छाशक्ती असेल तर आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढणा-या आणि जेलमध्ये जाणा-या कार्यकर्त्यांना एका दिवसात योग्य मानसन्मानासह त्यांचा अधिकारही मिळू शकतो. राज्यस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात असा अधिकार मिसा बाधितांना मिळाला आहे. परंतु महाराष्ट्र राज्य सरकारच्या उदासिनतेमुळेच मिसा बाधितांना त्यांचा हक्क मिळालेला नाही. आणीबाणी विरोधकांच्याच विचार धारेचे भाजप सरकार सत्तेत येऊनही अडीच वर्षे झाले तरी न्याय मिळू शकला नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. प्रांत अध्यक्ष जयप्रकाश पांडे यांनी आम्ही चालत्या गाडीतुन उतणारे कार्यकर्ते आहे. परंतु आज चालत्या गाडीत बसणारांची संख्या वाढली असल्याचे सांगत भाजपला खोचक टोला दिला. तसेच मिसाबंदी त्यांच्या अधिकारांसाठी एकत्र आले आहेत. ते कोणाकडेही याचना करीत नाहीत. परंतु ज्या कार्यकर्त्यांनी आणीबाणीच्या काळात लढा देऊन लोकशाहीला वाचवले. त्यांना एक गुलाबाचे फूल आणि अर्धा कप चहा देऊ त्याचा सन्मान करण्याचीही सरकारची मानसिकता नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.