शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

आणीबाणीविरोधी कार्यकर्त्यांप्रती सरकार कृतघ्न झाल्याचा आरोप

By admin | Updated: March 4, 2017 17:20 IST

आणीबाणीला विरोध करून ख-या अर्थाने लोकशाहीची पुर्नस्थापना करणा-या कार्यकर्त्यांप्रती सरकार कृतघ्न झाल्याचा आरोप अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संघाचे उपाध्यक्ष रवींद्र कासखेडीकर यांनी केला.

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 4 -  देशात २६  जून १९७५ रोजी देशात लादण्यात आलेल्या आणीबाणी काळात मिसा कायद्याअंतर्गत हजारो कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले होते. यात समाजवादी पक्षाचे कार्येकर्ते, आनंदमार्गी व काही काँग्रसमधील कार्येकर्त्यांसह लोकतंत्र सेनानी संघाच्या कार्यकर्त्यांची कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट आहे. या काळात आणीबाणीला विरोध करून ख-या अर्थाने लोकशाहीची पुर्नस्थापना करणा-या कार्यकर्त्यांप्रती सरकार कृतघ्न झाल्याचा आरोप अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संघाचे उपाध्यक्ष रवींद्र कासखेडीकर यांनी नाशिक येथे आयोजित लोकतंत्र सेनानी संघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात केला.
 
सरकारची इच्छाशक्ती असेल तर आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढणा-या आणि जेलमध्ये जाणा-या कार्यकर्त्यांना एका दिवसात योग्य मानसन्मानासह त्यांचा अधिकारही मिळू शकतो. राज्यस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात असा अधिकार मिसा बाधितांना मिळाला आहे. परंतु महाराष्ट्र राज्य सरकारच्या उदासिनतेमुळेच मिसा बाधितांना त्यांचा हक्क मिळालेला नाही. आणीबाणी विरोधकांच्याच विचार धारेचे भाजप सरकार सत्तेत येऊनही अडीच वर्षे झाले तरी न्याय मिळू शकला नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. प्रांत अध्यक्ष जयप्रकाश पांडे यांनी आम्ही चालत्या गाडीतुन उतणारे कार्यकर्ते आहे. परंतु आज चालत्या गाडीत बसणारांची संख्या वाढली असल्याचे सांगत भाजपला खोचक टोला दिला. तसेच मिसाबंदी त्यांच्या अधिकारांसाठी एकत्र आले आहेत. ते कोणाकडेही याचना करीत नाहीत. परंतु ज्या कार्यकर्त्यांनी आणीबाणीच्या काळात लढा देऊन लोकशाहीला वाचवले. त्यांना एक गुलाबाचे फूल आणि अर्धा कप चहा देऊ त्याचा सन्मान करण्याचीही सरकारची मानसिकता नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.