शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे सरकार मजबूत : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:13 IST

येवला : महाराष्ट्रातील भूमीत कुणी चाणक्यबिणक्य चालणार नाही, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे सरकार मजबुतीने उभे आहे. त्यामुळे ...

येवला : महाराष्ट्रातील भूमीत कुणी चाणक्यबिणक्य चालणार नाही, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे सरकार मजबुतीने उभे आहे. त्यामुळे वर्षभर प्रयत्न करून सुद्धा काही झाले नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

येवला दौऱ्यावर आलेल्या भुजबळांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सदर प्रतिक्रिया व्यक्त केली. आज कोकणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा होत असून त्या पूर्वी खासदार नारायण राणे यांनी अमित शहा यांच्या पायगुणामुळे सरकार जाईल अशी प्रतिक्रिया देत भाजपाचे ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू झाले अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यावर भुजबळांनी कोणी चाणक्यबिणक्या महाराष्ट्रातील भूमीत चालणार नसल्याचे स्पष्ट करत, महाराष्ट्रातील जनतेने हे सरकार स्वीकारले असून ज्यावेळी जनता सरकारला स्वीकारते तेव्हा कोणी हात लावू शकत नसल्याचे स्पष्ट केले.

शरद पवार यांना अदानी जाऊन भेटले या विषयावर बोलताना भुजबळ म्हणाले, पवार साहेबांना सगळेच लोक भेटत असतात, त्यामुळे अदानी पवारांना भेटल्यामुळे वीज बिल माफी रद्द झाली असे नाही. खरे तर फडणवीसांच्या काळातील वीज थकबाकी ही ५० हजार कोटीच्या घरात आहे, जर वीज बिल भरले नाही तर वीज वितरण कंपनी बुडल्याशिवाय राहणार नाही आणि बाकीच्या लोकांना हे हवे आहे. जेवढे अडचणीत येईल तेवढे बघायला अदानी आणि अंबानी आहेच असा टोला भुजबळ यांनी यावेळी लगावला. ओबीसी मोर्चाबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे यांनी २७ तारखेच्या मोर्चाचे आमंत्रण दिले आहे. विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बनवण्यासाठी शिडीची गरज भासणार नसल्याच्या वक्तव्याचा समाचार घेताना अगोदर सरकार पाडून तर दाखवा मग शिडी लावायची कि शिडी बॉम्ब लावायचा हे ठरवा असा टोला भुजबळ यांनी मारला.