शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे सरकार मजबूत : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:13 IST

येवला : महाराष्ट्रातील भूमीत कुणी चाणक्यबिणक्य चालणार नाही, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे सरकार मजबुतीने उभे आहे. त्यामुळे ...

येवला : महाराष्ट्रातील भूमीत कुणी चाणक्यबिणक्य चालणार नाही, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे सरकार मजबुतीने उभे आहे. त्यामुळे वर्षभर प्रयत्न करून सुद्धा काही झाले नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

येवला दौऱ्यावर आलेल्या भुजबळांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सदर प्रतिक्रिया व्यक्त केली. आज कोकणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा होत असून त्या पूर्वी खासदार नारायण राणे यांनी अमित शहा यांच्या पायगुणामुळे सरकार जाईल अशी प्रतिक्रिया देत भाजपाचे ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू झाले अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यावर भुजबळांनी कोणी चाणक्यबिणक्या महाराष्ट्रातील भूमीत चालणार नसल्याचे स्पष्ट करत, महाराष्ट्रातील जनतेने हे सरकार स्वीकारले असून ज्यावेळी जनता सरकारला स्वीकारते तेव्हा कोणी हात लावू शकत नसल्याचे स्पष्ट केले.

शरद पवार यांना अदानी जाऊन भेटले या विषयावर बोलताना भुजबळ म्हणाले, पवार साहेबांना सगळेच लोक भेटत असतात, त्यामुळे अदानी पवारांना भेटल्यामुळे वीज बिल माफी रद्द झाली असे नाही. खरे तर फडणवीसांच्या काळातील वीज थकबाकी ही ५० हजार कोटीच्या घरात आहे, जर वीज बिल भरले नाही तर वीज वितरण कंपनी बुडल्याशिवाय राहणार नाही आणि बाकीच्या लोकांना हे हवे आहे. जेवढे अडचणीत येईल तेवढे बघायला अदानी आणि अंबानी आहेच असा टोला भुजबळ यांनी यावेळी लगावला. ओबीसी मोर्चाबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे यांनी २७ तारखेच्या मोर्चाचे आमंत्रण दिले आहे. विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बनवण्यासाठी शिडीची गरज भासणार नसल्याच्या वक्तव्याचा समाचार घेताना अगोदर सरकार पाडून तर दाखवा मग शिडी लावायची कि शिडी बॉम्ब लावायचा हे ठरवा असा टोला भुजबळ यांनी मारला.