शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:14 IST

नाशिक : बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्य शाळांमधील आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी राखीव २५ ...

नाशिक : बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्य शाळांमधील आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी राखीव २५ टक्के जागांवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी सोडत जाहीर झाली असली तरी अद्याप प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. प्रवेश प्रक्रिया लांबल्याने सोडतीत प्रवेशाची संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्येही प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे पालकांमध्ये त्यांच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी पालकांकडून जोर धरू लागली आहे.

नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ जागांसाठी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी तब्बल १३ हजार ३३० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ७ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या सोडतीमध्ये केवळ ४२०८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. मात्र यापैकी प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रिक्त राहणाऱ्या जागांसाठी पुन्हा प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे. अशा परिस्थितीत प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधीची दीर्घकाळ प्रतीक्षा कारावी लागत असल्याने त्यांना अन्य शाळांमध्येही प्रवेश मिळत नसल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. त्यामुळे पालकांची निराशा होत असल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटतो. त्यामुळे या वर्षी अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे

-----

इन्फो -

जिल्ह्यातील आरटीईची स्थिती

शाळा - ४५०

उपलब्ध जागा - ४,५४४

प्राप्त अर्ज - १३,३३०

लॉटरीत निवड - ४,२०८

---

कोट-

अनुदानित, खासगी अनुदानित व विनाअनुदानित जवळपास सर्वच शाळांमधील पहिलीचे प्रवेश पूर्ण होत आले आहेत. अशा परिस्थितीत आरटीई अंतर्गत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांचेही प्रवेश अद्याप होऊ शकलेले नाहीत. तर प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊन शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश मिळणे आवश्यक आहे.

- दीपाली थेटे, पालक, राजीवनगर