शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावे - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:15 IST

नाशिक : बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्य शाळांमधील आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी राखीव २५ ...

नाशिक : बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्य शाळांमधील आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी राखीव २५ टक्के जागांवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी सोडत जाहीर झाली असली तरी अद्याप प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. प्रवेश प्रक्रिया लांबल्याने सोडतीत प्रवेशाची संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्येही प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे पालकांमध्ये त्यांच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी पालकांकडून जोर धरू लागली आहे.

नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ जागांसाठी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी तब्बल १३ हजार ३३० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ७ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या सोडतीमध्ये केवळ ४२०८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. मात्र यापैकी प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रिक्त राहणाऱ्या जागांसाठी पुन्हा प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे. अशा परिस्थितीत प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधीची दीर्घकाळ प्रतीक्षा कारावी लागत असल्याने त्यांना अन्य शाळांमध्येही प्रवेश मिळत नसल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. त्यामुळे पालकांची निराशा होत असल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटतो. त्यामुळे या वर्षी अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे

-----

इन्फो -

जिल्ह्यातील आरटीईची स्थिती

शाळा - ४५०

उपलब्ध जागा - ४,५४४

प्राप्त अर्ज - १३,३३०

लॉटरीत निवड - ४,२०८

---

कोट-

अनुदानित, खासगी अनुदानित व विनाअनुदानित जवळपास सर्वच शाळांमधील पहिलीचे प्रवेश पूर्ण होत आले आहेत. अशा परिस्थितीत आरटीई अंतर्गत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांचेही प्रवेश अद्याप होऊ शकलेले नाहीत. तर प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊन शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश मिळणे आवश्यक आहे.

- दीपाली थेटे, पालक, राजीवनगर