शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावे - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:15 IST

नाशिक : बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्य शाळांमधील आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी राखीव २५ ...

नाशिक : बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्य शाळांमधील आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी राखीव २५ टक्के जागांवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी सोडत जाहीर झाली असली तरी अद्याप प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. प्रवेश प्रक्रिया लांबल्याने सोडतीत प्रवेशाची संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्येही प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे पालकांमध्ये त्यांच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी पालकांकडून जोर धरू लागली आहे.

नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ जागांसाठी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी तब्बल १३ हजार ३३० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ७ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या सोडतीमध्ये केवळ ४२०८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. मात्र यापैकी प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रिक्त राहणाऱ्या जागांसाठी पुन्हा प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे. अशा परिस्थितीत प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधीची दीर्घकाळ प्रतीक्षा कारावी लागत असल्याने त्यांना अन्य शाळांमध्येही प्रवेश मिळत नसल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. त्यामुळे पालकांची निराशा होत असल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटतो. त्यामुळे या वर्षी अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे

-----

इन्फो -

जिल्ह्यातील आरटीईची स्थिती

शाळा - ४५०

उपलब्ध जागा - ४,५४४

प्राप्त अर्ज - १३,३३०

लॉटरीत निवड - ४,२०८

---

कोट-

अनुदानित, खासगी अनुदानित व विनाअनुदानित जवळपास सर्वच शाळांमधील पहिलीचे प्रवेश पूर्ण होत आले आहेत. अशा परिस्थितीत आरटीई अंतर्गत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांचेही प्रवेश अद्याप होऊ शकलेले नाहीत. तर प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊन शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अर्ज करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश मिळणे आवश्यक आहे.

- दीपाली थेटे, पालक, राजीवनगर