शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अन्य सर्व नोंदी अपडेट; केवळ बळींच्याच नोंदींचा प्रलंबित घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात गत गुरुवारपासून पोर्टलवरील बळींची माहिती अपडेट करण्यात येत असून त्यात रुग्णांशी संबंधित अन्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : जिल्ह्यात गत गुरुवारपासून पोर्टलवरील बळींची माहिती अपडेट करण्यात येत असून त्यात रुग्णांशी संबंधित अन्य सर्व नोंदी आधीपासूनच अपडेटेड आहेत. त्यामुळे जर आधीपासून अन्य सर्व नोंदी अपडेट ठेवता आल्या होत्या, तर केवळ बळींच्याच नोंदी अपडेट न ठेवण्यामागे हेतूपुरस्सर केलेली दिशाभूल किंवा शासनाकडून जाब विचारला जाऊ नये, म्हणून हेतूपुरस्सर केलेला घोळ हेच कारण दिसत असल्याची चर्चा आता आरोग्य वर्तुळात होऊ लागली आहे.

दुसऱ्या लाटेत सर्वच रुग्णालये आणि कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण असल्याचे सगळ्यात मोठे कारण यंत्रणेने पुढे केले होते. त्याचबरोबर फॅसिलिटी ॲप कार्यान्वित न होणे, इंटरनेट कनेक्टीव्हीटीच्या अडचणी, प्रयोगशाळेतून रुग्णांचा आयसीएमआरआयडी वेळेत प्राप्त न होणे, डाटा एंट्री करणारे कुशल मनुष्यबळ आजारी पडणे, मनुष्यबळाची अनुपलब्धता यासारख्या अनेक बाबींमुळे काही रुग्णालयांमार्फत मागील काही महिन्यांतील मृत्यू पोर्टलवर अपलोड केले गेले नसल्याचे कारण जिल्हा प्रशासन आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडून सांगण्यात आले होते. तसेच त्याबाबत वेळोवेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून संबंधित स्थानिक यंत्रणांना सूचित करण्यात आले असल्याचा दावादेखील संबंधितांकडून करण्यात आला होता. अशा प्रकारच्या विविध अडचणींची कारणे पुढे करण्यात आली होती.

इन्फो

मृत्यूदर कमी दाखवण्यासाठी केला विलंब

जिल्हा शल्यचिकित्सकांनी नमूद केलेल्या सर्व अडचणी असतानाही नवीन बाधित, बरे रुग्ण, उपचारार्थी बाधित, बरे झालेली टक्केवारी, एकूण निगेटीव्ह, प्रलंबित अहवाल या सर्व बाबी पोर्टलवर अपडेट करणे जर संबंधितांना शक्य झाले तर केवळ बळींची नोंद अपडेट करणेच का शक्य झाले नाही ? की केवळ बळींचीच नोंद पोर्टलवर अपडेट करणे टाळून जिल्हा प्रशासनाने मृत्यू दर कमी दाखवून कोरोना बहराच्या काळात आपली पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानल्याचीच चर्चा सुरू झाली आहे.

इन्फो

माहिती असूनही केले नाही अपडेट

गत सहा महिन्यांच्या काळात दररोजचे नवीन बाधित, बरे रुग्ण, एकूण उपचारार्थी, एकूण बाधित, बरे झालेली टक्केवारी, एकूण निगेटीव्ह, प्रलंबित अहवाल या सर्व बाबी दररोज किंवा दोन-चार दिवसात अपडेट केले जात होते. किंबहुना त्याबाबतची माहिती संकलित करुन ती अपडेट करण्याची जबाबदारीदेखील जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली होती. ही यंत्रणा केवळ या अन्य बाबी फिजीकली घेऊन पोर्टलवर अपडेट करीत राहिले. मात्र, बळींची संख्या फिजीकली माहिती घेऊनही अपडेट करणे टाळले गेल्यानेच नागरिकांची आणि शासनाची प्रचंड मोठी दिशाभूल केली गेल्याचेच त्यातून उघड होत असल्याच्या चर्चेला आरोग्य वर्तुळातच बहर आला आहे.