शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

येवल्यानजीक अपघातात चौघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:30 IST

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास येवल्यापासून १८ किमी अंतरावर झालेल्या भीषण तिहेरी अपघातात चार जण ठार, तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये औरंगाबाद येथील दोघे, तर पुणे व नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मुंबईतील मराठा मोर्चा आटोपून घराकडे परततांना मोर्चेकरी बांधवांवर काळाने झडप घातली.

ठळक मुद्दे मृतांमध्ये औरंगाबाद येथील दोघेमराठा मोर्चा आटोपून घराकडे परततांना अपघातअपघातात व्हर्ना गाडीचे प्रचंड नुकसान

येवला : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास येवल्यापासून १८ किमी अंतरावर झालेल्या भीषण तिहेरी अपघातात चार जण ठार, तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये औरंगाबाद येथील दोघे, तर पुणे व नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मुंबईतील मराठा मोर्चा आटोपून घराकडे परततांना मोर्चेकरी बांधवांवर काळाने झडप घातली. अपघातात व्हर्ना गाडीचे प्रचंड नुकसान झाले असून केवळ इंजिन शिल्लक होते.  गुरुवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा आटोपून औरंगाबादकडे व्हर्ना गाडीतून (क्र मांक एम.एच.-२०, ई ई.-७२८४) ने पाच जण परतत होते. वैजापूर कडून येवल्याच्या दिशेने ट्रक (क्र मांक एम.एच.१८ एम.३१९४) भरधाव वेगाने येतांना व्हर्ना गाडी खामगाव शिवारात मारुती ८०० कार (एमएच बीडब्ल्वू ५१७८) ला ओव्हरटेक करतांना, समोरून वेगाने येणाºया ट्रकवर आदळली. अपघातात व्हर्ना गाडीतील पाचपैकी तिघे जागीच ठार झाले. त्यात हर्षल अनिल घोलप (२४, रा. गावठाण, रोखडी,पुणे), नारायण कृष्णा थोरात (२१, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अविनाश नवनाथ गव्हाणे ( २३ रा.बजाजनगर ,औरंगाबाद ) यांचा समावेश आहे. मारुती कारमधील वैभव राधाकृष्ण गटकळ (२१,रा. मातेरेवाडी जि.नाशिक) हा सुद्धा जागीच ठार झाला. येवला ग्रामीण रूग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अपघातात गौरव रामपालसिंग प्रजापती (२३,रा. सिडको, औरंगाबाद) व उमेश गोपाल भगत (रा.बजाजनगर, औरंगाबाद ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी येवला तालुका पोलिसांनी ट्रकचालक नूर इब्राहीम शेख, (३५) याला अटक केली आहे.