शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
3
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
4
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
5
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
6
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
7
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
8
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
9
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
10
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
11
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
12
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
13
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
14
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
15
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
17
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
18
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
19
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
20
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

कुटुंब सर्वेक्षणात विभागातील पाचही जिल्हे पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:25 IST

नाशिक: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात नाशिक विभागातील ...

नाशिक: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या कामगिरीवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाराजी व्यक्त केली असून, अनेक जिल्ह्यात या मोहिमेेतंर्गत घरोघरी जाऊन रूग्णांचा शोध घेण्यास टाळाटाळ तसेच त्यांची कोरोना तपासणी करण्यास उदासीनता दिसून आल्याने गमे यांनी सर्व जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना संशयित रूग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे व त्यांना उपचारार्थ रूग्णालयात भरती करणे हा या मोहिमेचा मुख्य भाग असून, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास हातभार लागण्याबरोबरच घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रूग्णांचा शोध घेणे सहज शक्य झाले आहे. आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ही मोहीम राबविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांवर सोपविण्यात आली आहे. गेल्या चार ते सहा महिन्यांपासून ही मोहीम राबवून दरमहा त्याचा आढावा विभागीय आयुक्तांकडून घेतला जात आहे. काही महिन्यांपूर्वी या मोहिमेच्या माध्यमातून रूग्णांचा शोध घेण्यास मोठा हातभार लागल्याची उदाहरणेही आहेत. तथापि, मार्च, एप्रिल महिन्यात या मोहिमेचे काम काहीसे थंडावले असल्याचे विभागीय आयुक्तांना प्रत्येक जिल्ह्याने पाठविलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

संशयित रूग्णांचा शोध घेतल्यानंतरही त्याची तपासणी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आले असून, काही जिल्ह्यात तर सर्वेक्षणच करण्यात आले नसल्याचे तर संशयित रूग्णांच्या संख्येच्या प्रमाणात तपासणी करण्यात आली नाही. नगरपंचायत, नगरपालिकांची या कामात उदासीनता दिसून आली असल्याने विभागीय आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

-----------

विभागीय आयुक्तांची निरीक्षणे

१) नाशिक जिल्हा- इगतपुरी, मालेगाव व येवला तीन तालुक्यात रूग्ण शोध मोहीम अत्यंत कमी आहे. संशयित व्यक्तींची संख्या २४४७ असतानाही १६३१ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले नाहीत.

२) धुळे जिल्हा- संशयित रूग्णांची संख्या ४७८ आहे. परंतु त्यापैकी एकाही व्यक्तीची तपासणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वेक्षणाचा उद्देश सफल होत नाही.

३) जळगाव जिल्हा- वरणगाव नगर परिषदेचा अहवाल वस्तुस्थिती दर्शक असल्याचा संशय. जामनेर ग्रामीण, पारोळा, सावदा नगर परिषदेत सर्वेक्षण गांभीर्याने सुरू असल्याचे दिसत नाही.

४) नंदुरबार जिल्हा- शहादा नगर परिषद, तळोदा ग्रामीण, तळोदा शहर या ठिकाणी सर्वेक्षण गांभीर्याने सुरू नाही. ३६१ संशयित रूग्णांपैकी फक्त २० व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले.

५) अहमदनगर जिल्हा- नगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याचे दिसून येत नाही. संशयित व्यक्तींची संख्या ४९०२ असून, त्यापैकी फक्त ७४३ व्यक्तींचीच टेस्ट घेण्यात आली आहे.