शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

‘उपर तक कम्पलेट करुंगा’ आखाडा महंत यांचा प्रशासनाला इशारा

By admin | Updated: May 20, 2015 01:20 IST

‘उपर तक कम्पलेट करुंगा’ आखाडा महंत यांचा प्रशासनाला इशारा

  नाशिक : ‘परंपरेसे हमारा आखाडा है, आपने उसे आश्रम कैसे बना दिया? जब की सब आखाडोंको सुविधा दि जा रही है तो हमे क्यूं नही? हमे भी शेड मिलनी चाहिए अगर नही दोगे तो उपर तक कम्पलेट करुंगा’ अशी धमकी वजा इशारा त्र्यंबकेश्वरच्या सीताराम आखाड्याचे महंत श्री बालयोगीदासजी महाराज यांनी जिल्हा प्रशासनााला दिला आहे. त्र्यंबकेश्वर येथील दहा आखाडे व जवळपास चोवीसहून अधिक धार्मिक संस्थांना सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी पक्के शेड बांधून दिले जात असून, त्यासाठी जवळपास साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्र्यंबक नगरपरिषदेने मंजूर केलेल्या या शेडबाबत अगोदरच वाद असतानाच त्यात सीताराम आखाड्याच्या महंतांनी उडी घेतली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्र्यंबकेश्वरच्या इतर आखाड्यांप्रमाणेच सीताराम आखाडा जुना व परंपरागत असून, कुंभमेळ्याच्या शाहीस्नानात आखाडा सहभागी होत असतानाही सोयी-सुविधा पुरविण्याबाबत भेदाभेद केला जात असल्याचा आरोप बालयोगीदास महाराज यांनी केला. सोमवारी बालयोगीदास महाराज यांनी कुंभमेळा अधिकाऱ्यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. सीताराम आखाड्याला आश्रम करण्यामागचा हेतू काय? याबाबत जाब विचारतानाच आखाड्याला शेड देतात की नाही अशी निर्वाणीची विचारणा करून तुम्हाला द्यायचे नसेल तर तसे सांगा, त्र्यंबकच्या मुख्याधिकाऱ्याकडे पाठवू नका, ते म्हणतात तुमच्याकडे आणि तुम्ही म्हणतात त्यांच्याकडे, असे करू नका अशी तंबी देऊन तुमच्याकडून होत नसेल तर सांगा, मी वरून शेड मंजूर करून आणतो, असे महंतांनी सांगताच मेळा अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. सुमारे अर्धातास महंतांनी कुंभमेळा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरून प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर महंतांची समजूत घालण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून सीताराम आश्रमाला शेड मंजूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.