शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शक्तिहीन सरकार जनतेच्या काय कामाचे अजित पवार यांचा सवाल; जाहिरातबाजीतून चेहरे दाखविण्याचा प्रयत्न

By श्याम बागुल | Updated: March 30, 2023 19:17 IST

अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

नाशिक : कोट्यवधी रुपये जाहिरातबाजीवर खर्च करून गतिमान सरकारची जाहिरात करणारे राज्य सरकार गतिमान नव्हे तर शक्तिहीन व नपुंसक सरकार असल्याचे खुद्द सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर असे सरकार काय कामाचे, असा सवाल करीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारमधील लोकांकडे कोणी बघत नाही म्हणून जाहिरातबाजीतून चेहरे दाखविण्याचा हा प्रयत्न असल्याची बोचरी टीका केली आहे.

अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यात जात, धर्माच्या आधारावर वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत राजकीय पोळी भाजून घेण्याचा उद्योग काही लोक करीत असून, संभाजीनगरची घटना त्याचाच एक प्रकार असल्याचा आरोप करून अजित पवार यांनी, महापुरुषांच्या नावाने राज्यपालांपासून ते पक्ष प्रवक्त्यांपर्यंत साऱ्यांनी अवमानकारक वक्तव्ये केली. त्यावेळी मूग गिळून बसलेल्यांनी आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी सावकर गौरव यात्रा काढण्याची घोेषणा केली आहे. सावरकरांचे योगदान विसरता येणार नाही, मात्र ज्यावेळी महापुरुषांचा अवमान केला गेला त्यावेळी त्यांच्या नावाची गौरव यात्रा का काढली नाही, असा सवालही त्यांनी भाजपला केला.

गेल्या सात महिन्यांत राज्य सरकारने जाहिरातबाजीतून ७५ कोटी रुपये खर्च केले, आगामी अर्थसंकल्पात त्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यावर आम्ही आक्षेप घेतला. तेव्हा मुख्यमंत्री सहायता निधीतून २८ कोटी रुपये रुग्णांच्या साहाय्यतेसाठी केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. परंतु, त्यापेक्षाही दुप्पट, तिप्पट पैसे या सरकारने जाहिरातबाजीवर खर्च केल्याची टीका करून पवार यांनी, एखाद्याला आपले प्रॉडक्ट म्हणजे साबण, तेल, पावडर विकायचे असेल तर जाहिरात करावी लागते. परंतु काम न करणारे सरकार जाहिरातीतून आपले फोटो दाखवित असून, जाहिरातबाजीपेक्षा लोकांच्या मनात स्थान निर्माण करा, असा सल्लाही दिला.