शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

शक्तिहीन सरकार जनतेच्या काय कामाचे अजित पवार यांचा सवाल; जाहिरातबाजीतून चेहरे दाखविण्याचा प्रयत्न

By श्याम बागुल | Updated: March 30, 2023 19:17 IST

अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

नाशिक : कोट्यवधी रुपये जाहिरातबाजीवर खर्च करून गतिमान सरकारची जाहिरात करणारे राज्य सरकार गतिमान नव्हे तर शक्तिहीन व नपुंसक सरकार असल्याचे खुद्द सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर असे सरकार काय कामाचे, असा सवाल करीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारमधील लोकांकडे कोणी बघत नाही म्हणून जाहिरातबाजीतून चेहरे दाखविण्याचा हा प्रयत्न असल्याची बोचरी टीका केली आहे.

अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यात जात, धर्माच्या आधारावर वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत राजकीय पोळी भाजून घेण्याचा उद्योग काही लोक करीत असून, संभाजीनगरची घटना त्याचाच एक प्रकार असल्याचा आरोप करून अजित पवार यांनी, महापुरुषांच्या नावाने राज्यपालांपासून ते पक्ष प्रवक्त्यांपर्यंत साऱ्यांनी अवमानकारक वक्तव्ये केली. त्यावेळी मूग गिळून बसलेल्यांनी आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी सावकर गौरव यात्रा काढण्याची घोेषणा केली आहे. सावरकरांचे योगदान विसरता येणार नाही, मात्र ज्यावेळी महापुरुषांचा अवमान केला गेला त्यावेळी त्यांच्या नावाची गौरव यात्रा का काढली नाही, असा सवालही त्यांनी भाजपला केला.

गेल्या सात महिन्यांत राज्य सरकारने जाहिरातबाजीतून ७५ कोटी रुपये खर्च केले, आगामी अर्थसंकल्पात त्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यावर आम्ही आक्षेप घेतला. तेव्हा मुख्यमंत्री सहायता निधीतून २८ कोटी रुपये रुग्णांच्या साहाय्यतेसाठी केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. परंतु, त्यापेक्षाही दुप्पट, तिप्पट पैसे या सरकारने जाहिरातबाजीवर खर्च केल्याची टीका करून पवार यांनी, एखाद्याला आपले प्रॉडक्ट म्हणजे साबण, तेल, पावडर विकायचे असेल तर जाहिरात करावी लागते. परंतु काम न करणारे सरकार जाहिरातीतून आपले फोटो दाखवित असून, जाहिरातबाजीपेक्षा लोकांच्या मनात स्थान निर्माण करा, असा सल्लाही दिला.