शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शक्तिहीन सरकार जनतेच्या काय कामाचे अजित पवार यांचा सवाल; जाहिरातबाजीतून चेहरे दाखविण्याचा प्रयत्न

By श्याम बागुल | Updated: March 30, 2023 19:17 IST

अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

नाशिक : कोट्यवधी रुपये जाहिरातबाजीवर खर्च करून गतिमान सरकारची जाहिरात करणारे राज्य सरकार गतिमान नव्हे तर शक्तिहीन व नपुंसक सरकार असल्याचे खुद्द सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर असे सरकार काय कामाचे, असा सवाल करीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारमधील लोकांकडे कोणी बघत नाही म्हणून जाहिरातबाजीतून चेहरे दाखविण्याचा हा प्रयत्न असल्याची बोचरी टीका केली आहे.

अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यात जात, धर्माच्या आधारावर वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत राजकीय पोळी भाजून घेण्याचा उद्योग काही लोक करीत असून, संभाजीनगरची घटना त्याचाच एक प्रकार असल्याचा आरोप करून अजित पवार यांनी, महापुरुषांच्या नावाने राज्यपालांपासून ते पक्ष प्रवक्त्यांपर्यंत साऱ्यांनी अवमानकारक वक्तव्ये केली. त्यावेळी मूग गिळून बसलेल्यांनी आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी सावकर गौरव यात्रा काढण्याची घोेषणा केली आहे. सावरकरांचे योगदान विसरता येणार नाही, मात्र ज्यावेळी महापुरुषांचा अवमान केला गेला त्यावेळी त्यांच्या नावाची गौरव यात्रा का काढली नाही, असा सवालही त्यांनी भाजपला केला.

गेल्या सात महिन्यांत राज्य सरकारने जाहिरातबाजीतून ७५ कोटी रुपये खर्च केले, आगामी अर्थसंकल्पात त्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यावर आम्ही आक्षेप घेतला. तेव्हा मुख्यमंत्री सहायता निधीतून २८ कोटी रुपये रुग्णांच्या साहाय्यतेसाठी केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. परंतु, त्यापेक्षाही दुप्पट, तिप्पट पैसे या सरकारने जाहिरातबाजीवर खर्च केल्याची टीका करून पवार यांनी, एखाद्याला आपले प्रॉडक्ट म्हणजे साबण, तेल, पावडर विकायचे असेल तर जाहिरात करावी लागते. परंतु काम न करणारे सरकार जाहिरातीतून आपले फोटो दाखवित असून, जाहिरातबाजीपेक्षा लोकांच्या मनात स्थान निर्माण करा, असा सल्लाही दिला.