शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांचा उडाला ‘बार’;नाशिकची हवा झाली बेजार;वायू प्रदूषणाची पातळी पोहोचली २५६ वर

By अझहर शेख | Updated: November 13, 2023 17:58 IST

नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेवर मोठा दुष्परिणाम.

नाशिक : शहरात लक्ष्मीपूजनाला नाशिककरांनी फटाक्यांचा जमके ‘बार’ केला. यामुळे वातावरणातील हवेच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. लक्ष्मीपूजनाच्या अगोदर समाधानकारक नाशिकच्या हवेचा स्तर अचानकपणे रविवारी (दि.१२) ढासळला. नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेवर मोठा दुष्परिणाम झाल्याने वायू प्रदूषण धोकादायक पातळीपर्यंत जाऊन पोहोचले. प्रदूषण पातळी २५६पर्यंत गेल्याची नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आली.

अल्हाददायक वातावरणाचे शहर अशी ओळख असलेल्या नाशिकची हवा धनत्रयोदशीपासून बिघडण्यास सुरुवात झाली. दिवाळीची धामधूम धनत्रयोदशीपासून सुरू झाली. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.११) हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११८ इतका होता; मात्र लक्ष्मीपूजनाच्या रात्री रविवारी यामध्ये कमालीची वाढ झाली. सायंकाळी साडेसहा वाजेपासूनच शहर व परिसरासह उपनगरांमध्ये फटाक्यांची जोरदार आतषबाजीला प्रारंभ झाला. मध्यरात्री १ वाजेपर्यंत फटाक्यांचा आवाज कानी येत होता. यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक रविवारी रात्री २०३पर्यंत वाढला होता. ध्वनीप्रदूषणाची पातळी जरी कमी राहिली असली तरी फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली. यामुळे नाशिकची हवा बिघडली. हवेचा गुणवत्ता निर्देशांक दोनशेच्या पुढे सरकल्यामुळे प्रदूषणाचा धोकादायक स्तर असल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून (सीपीसीबी)करण्यात आली आहे

पहाटे वातावरणात वाढले धुरकेसोमवारी पहाटे प्रदूषणाची पातळी वातावरणात दिसून आली. हवेत पांढऱ्या धुरक्यांचा थर मोठ्या प्रमाणात साचलेला होता. रविवारी रात्री शहरातील प्रत्येक गल्लीबोळात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. याचा परिणाम सोमवारी सकाळी पाहावयास मिळाला. पांढरे धुरके वातावरणात मोठ्या प्रमाणात मिसळले होते.

‘ग्रीन दिवाळी’चा पडला विसरनाशिक शहरात प्रदूषणमुक्त किंवा ग्रीन दिवाळी यंदा साजरी होऊ शकली नाही. शासकीय यंत्रणांकडून करण्यात आलेल्या आवाहनाला नाशिककरांकडून हरताळ फासला गेला. राज्यात मुंबई, पुणेसारख्या शहरांमध्ये वायू प्रदूषण कमालीचे वाढल्याने दिवाळीच्या निमित्ताने फटाके फोडू नका, ग्रीन दीपावली साजरी करा, असे आवाहन केले जात होते; मात्र या आवाहनाला नाशिकमध्ये फारसा प्रतिसाद मिळालेला दिसून आला नाही.

जीव गुदमरायला झाला...लक्ष्मीपूजनाच्या रात्री नाशिक शहर व उपनगरांमधून फेरफटका मारताना वातावरणात पसरलेला धूर व दुर्गंधीमुळे नागरिकांचा जीव गुदमरायला झाला होता. दम्याचे विकार असलेल्या नागरिकांना त्याचा अधिक त्रास जाणवला. तसेच, सामान्य नागरिकांनासुद्धा श्वासोच्छ्वास करताना अडथळा निर्माण होत असल्याचा अनुभव आला.

टॅग्स :NashikनाशिकDiwaliदिवाळी 2023fire crackerफटाकेpollutionप्रदूषण