शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अग्रोहाधाम मोटारसायकल रॅलीची रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती

By admin | Updated: November 14, 2016 14:51 IST

शात राष्ट्रीय एकात्मता, मैत्री व सद्भावनेचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या अग्रोहाधाम मोटारसायकल रॅलीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त या रॅलीत सहभागी तरुणांचा सत्कार करण्यात येईल.

मंगळवारी लोणावळा येथे रॅलीतील तरुणांचा सन्मान सोहळाऑनलाइन लोकमतनाशिक, दि. १४ -  देशात राष्ट्रीय एकात्मता, मैत्री व सद्भावनेचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या अग्रोहाधाम मोटारसायकल रॅलीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त या रॅलीत सहभागी तरुणांचा मंगळवारी (दि. १५) लोणावळा येथे एका विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. पंजाबमधील अशांतता, राजस्थानातील आरक्षणाचे आंदोलन अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनातर्फे नोव्हेंबर १९९१ मध्ये देशपातळीवर मैत्री सद्भाव अग्रोहाधाम मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. महाराजा अग्रसेन यांची प्रतिमा असलेला एकात्मता रथ, १८ मोटारसायकल्स, रुग्णवाहिका आदि वाहनांचा या रॅलीत समावेश होता. पत्रकार किरण अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन व वीरेंद्र गनेडीवालसह चेअरमन असलेल्या या रॅलीचा प्रारंभ शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात दर्शन करून झाला होता. जालना, औरंगाबाद, धुळे, सुरत, बडोदा, अहमदाबाद, गांधीनगर, उदयपूर, अजमेर, जयपूर, बिकानेर, हिसार, भिवाणी, रोहोतक, मथुरा, आग्रा, वाराणसी, अयोध्या, लखनौ, कानपूर, अलाहाबाद, नागपूर, अमरावती अशा सुमारे दोनशेपेक्षा अधिक शहरांमध्ये विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून सभा घेऊन शांती सद्भावनेचा तसेच महाराजा श्री अग्रसेन यांच्या अहिंसावादाचा संदेश या रॅलीने पोहोचविला होता. अकोला येथे या रॅलीचा समारोप झाला होता. रॅलीतील तरुणांनी दिल्ली मुक्कामी माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, संसदेतील तत्कालीन विरोधीपक्ष नेते लालकृष्ण अडवाणी आदि मान्यवरांच्या भेटी घेतल्या होत्या. तर बोटक्लब येथे प्रख्यात सिने अभिनेते राजेश खन्ना यांच्यासह विविध मान्यवरांनी रॅलीचे स्वागत केले होते. अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे तत्कालीन अध्यक्ष बनारसीदास गुप्ता, प्रदीप मित्तल, राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी, दिल्लीचे ओमप्रकाश अग्रवाल, गोपाल अग्रवाल, जगदीश खेतान, मुरारीलाल टिबडेवाला, आर.बी. अग्रवाल, कमलकिशोर गोयंका आदिंनी रॅलीच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले होते. मंगळवारी रजत सन्माननोव्हेंबर १९९१ मध्ये काढण्यात आलेल्या रॅलीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यात सहभागी झालेल्या तरुणांचा लोणावळा येथे मंगळवारी एका विशेष समारंभात रजत सन्मान करण्यात येणार आहे. कॉसमॉस बॅँकेचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रसिद्ध भागवत कथाकार तथा उद्योगपती महेंद्रकुमार पाटोदिया, विजयकुमार चौधरी, राजेश अग्रवाल, विनोद जालान आदि मान्यवरांच्या उपस्थितीत सदर सन्मान सोहळा आयोजिण्यात आला आहे. सात राज्यांतून प्रवासमैत्री, सद्भावना, अग्रोहाधाम रॅलीने एकूण २४ दिवसांमध्ये महाराष्ट्रासह गुजराथ, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा सात राज्यांतून सुमारे सहा हजारपेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास केला होता. तसेच रॅलीप्रमुखांनी या राज्यांमध्ये सुमारे २०० पेक्षा अधिक ठिकाणी सार्वजनिक सभा घेऊन शांती, सद्भावनेचा संदेश दिला होता.