शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

अग्रोहाधाम मोटारसायकल रॅलीची रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती

By admin | Updated: November 14, 2016 14:51 IST

शात राष्ट्रीय एकात्मता, मैत्री व सद्भावनेचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या अग्रोहाधाम मोटारसायकल रॅलीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त या रॅलीत सहभागी तरुणांचा सत्कार करण्यात येईल.

मंगळवारी लोणावळा येथे रॅलीतील तरुणांचा सन्मान सोहळाऑनलाइन लोकमतनाशिक, दि. १४ -  देशात राष्ट्रीय एकात्मता, मैत्री व सद्भावनेचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या अग्रोहाधाम मोटारसायकल रॅलीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त या रॅलीत सहभागी तरुणांचा मंगळवारी (दि. १५) लोणावळा येथे एका विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. पंजाबमधील अशांतता, राजस्थानातील आरक्षणाचे आंदोलन अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनातर्फे नोव्हेंबर १९९१ मध्ये देशपातळीवर मैत्री सद्भाव अग्रोहाधाम मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. महाराजा अग्रसेन यांची प्रतिमा असलेला एकात्मता रथ, १८ मोटारसायकल्स, रुग्णवाहिका आदि वाहनांचा या रॅलीत समावेश होता. पत्रकार किरण अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन व वीरेंद्र गनेडीवालसह चेअरमन असलेल्या या रॅलीचा प्रारंभ शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात दर्शन करून झाला होता. जालना, औरंगाबाद, धुळे, सुरत, बडोदा, अहमदाबाद, गांधीनगर, उदयपूर, अजमेर, जयपूर, बिकानेर, हिसार, भिवाणी, रोहोतक, मथुरा, आग्रा, वाराणसी, अयोध्या, लखनौ, कानपूर, अलाहाबाद, नागपूर, अमरावती अशा सुमारे दोनशेपेक्षा अधिक शहरांमध्ये विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून सभा घेऊन शांती सद्भावनेचा तसेच महाराजा श्री अग्रसेन यांच्या अहिंसावादाचा संदेश या रॅलीने पोहोचविला होता. अकोला येथे या रॅलीचा समारोप झाला होता. रॅलीतील तरुणांनी दिल्ली मुक्कामी माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, संसदेतील तत्कालीन विरोधीपक्ष नेते लालकृष्ण अडवाणी आदि मान्यवरांच्या भेटी घेतल्या होत्या. तर बोटक्लब येथे प्रख्यात सिने अभिनेते राजेश खन्ना यांच्यासह विविध मान्यवरांनी रॅलीचे स्वागत केले होते. अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे तत्कालीन अध्यक्ष बनारसीदास गुप्ता, प्रदीप मित्तल, राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी, दिल्लीचे ओमप्रकाश अग्रवाल, गोपाल अग्रवाल, जगदीश खेतान, मुरारीलाल टिबडेवाला, आर.बी. अग्रवाल, कमलकिशोर गोयंका आदिंनी रॅलीच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले होते. मंगळवारी रजत सन्माननोव्हेंबर १९९१ मध्ये काढण्यात आलेल्या रॅलीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यात सहभागी झालेल्या तरुणांचा लोणावळा येथे मंगळवारी एका विशेष समारंभात रजत सन्मान करण्यात येणार आहे. कॉसमॉस बॅँकेचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रसिद्ध भागवत कथाकार तथा उद्योगपती महेंद्रकुमार पाटोदिया, विजयकुमार चौधरी, राजेश अग्रवाल, विनोद जालान आदि मान्यवरांच्या उपस्थितीत सदर सन्मान सोहळा आयोजिण्यात आला आहे. सात राज्यांतून प्रवासमैत्री, सद्भावना, अग्रोहाधाम रॅलीने एकूण २४ दिवसांमध्ये महाराष्ट्रासह गुजराथ, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा सात राज्यांतून सुमारे सहा हजारपेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास केला होता. तसेच रॅलीप्रमुखांनी या राज्यांमध्ये सुमारे २०० पेक्षा अधिक ठिकाणी सार्वजनिक सभा घेऊन शांती, सद्भावनेचा संदेश दिला होता.