शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

कृषी स्वावलंबन व कृषी क्रांती योजना ठरली केवळ फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 18:06 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची लाभार्थी सोडत काढण्यात आली. मात्र दोन्ही योजनेत तालुक्यातुन प्रत्येकी ९० प्रस्ताव असताना १० लाभार्थींची निवड झाली. प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

खाकुर्डी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची लाभार्थी सोडत काढण्यात आली. मात्र दोन्ही योजनेत तालुक्यातुन प्रत्येकी ९० प्रस्ताव असताना १० लाभार्थींची निवड झाली. प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.अनुसूचित जाती व जमाती शेतकºयांना कृषी योजनांचा लाभ दिला जातो. मात्र या वर्षी जिल्हा परिषदेने सोडत पद्धतीचा अवलंब केला. लाभार्थीचे प्रस्ताव दिवसेंदिवस वाढत असल्याने अनुदानाच्या प्रमाणात लाभ देणे शक्य होत नाही. यामुळे अनु. जातीच्या लाभार्थींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व जमातीच्या लाभार्थींना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातुन लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले. त्या प्रमाणे लाभार्थींकडून स्वतंत्र प्रस्ताव घेण्यात आले. जिल्ह्यला दोन कोटींचे अनुदान प्राप्त झाले. अनुदानाच्या प्रमाणात लाभार्थीची संख्या जास्त झाल्याने सोडत पद्धतीने निवड करण्यात आली. मात्र या निवड पद्धतीमुळे मोजक्याच लाभार्थींना लाभ मिळाल्याचे प्रतिक्षा यादी फुगली आहे.एकट्या मालेगाव तालुक्याला दोन कोटींच्या अनुदानाची आवश्यकता असताना २२ लाखांच्या अनुदानाने वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. तालुक्यात दोन्हीही योजनेत ९० व ९२ लाभार्थी आहेत. निवड यादी पंचायत समितींना देण्यात आले आहे. साधारण १० लाभार्थींना पुरेल एवढे अनुदान असल्याने ८० लोकांना किती दिवस प्रतिक्षा करावी लागणार याची शाश्वती शासनाकडून दिली गेली नसल्याने शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शेतकºयांना प्रोत्साहीत करण्यासाठी व अल्पभुधारकांना विविध वैयक्तीक लाभाच्या योजनेच्या माध्यमातुन उंच स्तरावर आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहे. मात्र त्यांना पुरेसे अनुदान मिळत नसल्याने योजनांचा पुरता बोजवारा उडाला आहे. सद्यस्थितीत सगळीकडेच भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. योजनेच्या माध्यमातुन विहिर, खोदणे किंवा ठिंबक सिंचन आदि प्रकारातुन लाभ दिला जाणार असला तरी दुष्काळाचा सामना करताना शेतकºयांना योजना राबवणे जिकीरीचे ठरणार आहे. विहिरी खोदूनही विहिरीला पाणी मिळणारच नाही.जिल्हा परिषद अंतर्गत दिल्या जाणाºया योजनांचा लाभ निकष व गुंतागुंतीची निवड पद्धत असल्याने लाभार्थ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करणे अवघड होते. एवढी मेहनत करुनही निवड न झाल्याने शेतकºयांच्या प्रश्नांवर पाणी फेरले गेल्याने नवोदित शेतकºयांना प्रेरणा मिळण्या ऐवजी प्रतिक्षा यादीचे दर्शन मिळाल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त के ली जात आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रGovernmentसरकार