शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कृषिमंत्री दादा भुसे यांचे केंद्रीयमंत्री गडकरींना महामार्ग कामाचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 00:40 IST

मालेगाव: राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आ ज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेऊन मालेगावसाठी राष्ट्रीय महामार्ग१६० आणि राज्य महामार्ग १९ अशा दोन मागण्या केल्या.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग १६० चे काम लवकर पूर्ण केल्यास नाशिक आणि मुंबईसाठी रहदारी अधिक सोयीची

मालेगाव: राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आ ज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेऊन मालेगावसाठी राष्ट्रीय महामार्ग१६० आणि राज्य महामार्ग १९ अशा दोन मागण्या केल्या.मालेगाव शहरासाठी बायपास असणारा सिन्नर घोटी त्र्यंबकेश्वर,मोखाडा, जव्हार विक्रमगड,मणारे,पालघर हा राष्ट्रीय महामार्ग १६० चे काम लवकर पूर्ण केल्यास नाशिक आणि मुंबईसाठी रहदारी अधिक सोयीची होईल.अशी विनंती भुसे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी याना केली. याशिवाय कोठारे, सटाणा मालेगाव चाळीसगाव राज्य महामार्ग १९ चे चौपदरीकरण ही लवकर पूर्ण केल्यास नाशिक जिल्ह्यातील वाहतूक अधिक सुरळीत होईल अशी विनंती केली असता केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्यांच्या दोन्ही मागण्या मान्य करून प्रश्न सोडविण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.पीक विमा कंपन्यांना नफा व तोटा यामध्ये संतुलन राखणारे बीड मॉडेल(८०:११०) यांचा समावेश पीक विमा योजनेत करावा अशी मागणी कृषिमंत्री भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचेकडे मंगळवारी केली तोमर यांची भेट घेऊन त्यांना बीड मॉडेल ची माहिती दिली. या मॉडेल मध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा अधिक विचार केला गेला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत याचा समावेश झाल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल अशा मागणीचे निवेदन तोमर याना दिले. याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि योजनांवर चर्चा केली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMalegaonमालेगांव