शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शेतकऱ्यांवर लादणारे कायदे नकोत, कृषी कायद्याचे पुनर्लेखन झाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

नाशिक : भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व असून, ६० टक्के जनतेला रोजगार पुरविणाऱ्या कृषिमालाला हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांवर ...

नाशिक : भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व असून, ६० टक्के जनतेला रोजगार पुरविणाऱ्या कृषिमालाला हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांवर लादणारे कायदे नकोत, व्यापारी कायद्यात सुधारणा होऊन सार्वमत संमती व्हावी, कृषिकायद्याचे पुनर्लेखन झाले पाहिजे आणि केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीनही कायद्यांमुळे निर्माण झालेली कोंडी फुटावी, असे मत नागपूर विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात शनिवार (दि.१३) अर्थशास्त्र विभागातर्फे ‘कृषी सुधारणा कायदे : वास्तव आणि परिणाम’ विषयावरील एकदिवसीय राज्यस्तरीय वेबिनार आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘कृषी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य (वृद्धी आणि पूरक व्यवस्था) कायदा २०२० चे विश्लेषण आणि कृषी सुधारणा कायद्याचे परिणाम’ विषयावर ते बोलत होते. प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी उद्घाटनप्रसंगी शेतकऱ्यांचे हित जपणारे कायदे हवेत, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. संजय तुपे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वैशाली जोशी यांनी केले, तर आभार शशिकांत साबळे यांनी मानले. यावेळी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. कृष्णा शहाणे व व्यावसायिक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुवर्णा कदम आदींची उपस्थिती होती. वेबिनारसाठी तांत्रिक साहाय्य प्रा. सुधाकर बोरसे व नरेश पाटील यांनी केले.

इन्फो

शेतकऱ्याला कृषिमाल विक्रीचे स्वातंत्र्य हवे : डॉ. प्रकास कांबळे वेबिनारच्या दुसऱ्या सत्रात द्वितीय सत्रात कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील माजी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश कांबळे यांनी ‘शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत’ आणि ‘कृषिसेवा करार २०२०, तसेच आवश्यक वस्तू दुरुस्ती कायदा २०२०’ या दोन कायद्यांचे विश्लेषण व परिणाम विषयांवर मार्गदर्शन केले. शेतीचा विकास आणि वृद्धिसुधारणा गतिमान करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, तसेच कृषिकायद्यात आवश्यक बदल करून कायदे संमत करणे. शेतकऱ्याला आपला माल इतर राज्य, बाहेर बाजारपेठेत विकण्याचे स्वातंत्र्य हवे असे सांगितले.