शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर लादणारे कायदे नकोत, कृषी कायद्याचे पुनर्लेखन झाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

नाशिक : भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व असून, ६० टक्के जनतेला रोजगार पुरविणाऱ्या कृषिमालाला हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांवर ...

नाशिक : भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व असून, ६० टक्के जनतेला रोजगार पुरविणाऱ्या कृषिमालाला हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांवर लादणारे कायदे नकोत, व्यापारी कायद्यात सुधारणा होऊन सार्वमत संमती व्हावी, कृषिकायद्याचे पुनर्लेखन झाले पाहिजे आणि केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीनही कायद्यांमुळे निर्माण झालेली कोंडी फुटावी, असे मत नागपूर विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात शनिवार (दि.१३) अर्थशास्त्र विभागातर्फे ‘कृषी सुधारणा कायदे : वास्तव आणि परिणाम’ विषयावरील एकदिवसीय राज्यस्तरीय वेबिनार आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘कृषी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य (वृद्धी आणि पूरक व्यवस्था) कायदा २०२० चे विश्लेषण आणि कृषी सुधारणा कायद्याचे परिणाम’ विषयावर ते बोलत होते. प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी उद्घाटनप्रसंगी शेतकऱ्यांचे हित जपणारे कायदे हवेत, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. संजय तुपे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वैशाली जोशी यांनी केले, तर आभार शशिकांत साबळे यांनी मानले. यावेळी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. कृष्णा शहाणे व व्यावसायिक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुवर्णा कदम आदींची उपस्थिती होती. वेबिनारसाठी तांत्रिक साहाय्य प्रा. सुधाकर बोरसे व नरेश पाटील यांनी केले.

इन्फो

शेतकऱ्याला कृषिमाल विक्रीचे स्वातंत्र्य हवे : डॉ. प्रकास कांबळे वेबिनारच्या दुसऱ्या सत्रात द्वितीय सत्रात कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील माजी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश कांबळे यांनी ‘शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत’ आणि ‘कृषिसेवा करार २०२०, तसेच आवश्यक वस्तू दुरुस्ती कायदा २०२०’ या दोन कायद्यांचे विश्लेषण व परिणाम विषयांवर मार्गदर्शन केले. शेतीचा विकास आणि वृद्धिसुधारणा गतिमान करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, तसेच कृषिकायद्यात आवश्यक बदल करून कायदे संमत करणे. शेतकऱ्याला आपला माल इतर राज्य, बाहेर बाजारपेठेत विकण्याचे स्वातंत्र्य हवे असे सांगितले.