शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

फळबागा वाचविण्यासाठी कृषी विभागाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:02 IST

कळवण : तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जवळपास तीनशे हेक्टर क्षेत्रावरील फळबागांमध्ये आच्छादनाचा प्रयोग राबविण्यात येते आहे.

ठळक मुद्देद्राक्ष, डाळिंब, आंबा आदी फळपिकांच्या बागांचा समावेश

कळवण : तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जवळपास तीनशे हेक्टर क्षेत्रावरील फळबागांमध्ये आच्छादनाचा प्रयोग राबविण्यात येते आहे. फळबाग वाचवा मोहिमेअंतर्गत गांगवण, दरेभणगी, निवाणे, नवी बेज, भांडणे (हा), शिरसा, कोसवण, सावकी पाळे या गावांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून फळबागांचे महत्त्व पटवून देण्यात आले.यंदाचा दुष्काळ फळबागांसाठी कर्दनकाळ ठरू पाहत आहे. पाण्याचे भीषण संकट, दरदिवशी आटत चाललेले स्रोत यंदा बागा वाचतील की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कळवण तालुक्यात फळबागांचे क्षेत्र जवळपास ३०० हेक्टरवर विस्तारले आहे. त्यामध्ये द्राक्ष, डाळिंब, आंबा आदी फळपिकांच्या बागांचा समावेश आहे.शिवाय नव्याने झालेली लागवडही पाणी कमतरतेमुळे संकटात सापडली आहे. टॅँकरने पाणी आणून बागा जगविण्यासाठीची आर्थिक क्षमता फारच थोड्या शेतकऱ्यांकडे आहे. शिवाय दरदिवशी आटत चालेल्या जलस्रोतांमुळे त्यांनाही दूरवरून किती पाणी आणून बागांना घालायचे यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणी सूक्ष्म सिंचन तंत्राचा उपयोग करून बागा वाचविता येतील का यासाठी कृषी विभागाने फळबागा वाचवा अभियान हाती घेतले आहे.झाडांच्या वयोमानानुसार प्रतिझाड, प्रतिदिन सूक्ष्म सिंचनाद्वारे नेमके किती लिटर पाणी लागते याची माहिती फळबाग वाचवा अभियानाच्या माध्यमातून फळबागायत दारांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. शिवाय दीर्घ मुदतीसाठी करावयाच्या उपाययोजना माहिती पत्रकाच्या रूपाने फळबागायतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून केले जात आहे.सध्याचा दुष्काळी परिस्थितीत फळबाग वाचविण्यासाठी कृषी विभागामार्फत अभियान राबविण्यात येत आहे. कृषी सहायकांमार्फत प्रत्येक गावात शेतकºयांचे मेळावे घेऊन प्रात्यक्षिकद्वारे मार्गदर्शन करण्यात येत असून, शेतकºयांनी आच्छादन वापर, मडका सिंचन, बोर्डी पेस्ट वापर आदी उपाययोजनांचा वापर करावा.- विजय पाटील, तालुका कृषी अधिकारी, कळवण