शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

फळबागा वाचविण्यासाठी कृषी विभागाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:02 IST

कळवण : तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जवळपास तीनशे हेक्टर क्षेत्रावरील फळबागांमध्ये आच्छादनाचा प्रयोग राबविण्यात येते आहे.

ठळक मुद्देद्राक्ष, डाळिंब, आंबा आदी फळपिकांच्या बागांचा समावेश

कळवण : तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जवळपास तीनशे हेक्टर क्षेत्रावरील फळबागांमध्ये आच्छादनाचा प्रयोग राबविण्यात येते आहे. फळबाग वाचवा मोहिमेअंतर्गत गांगवण, दरेभणगी, निवाणे, नवी बेज, भांडणे (हा), शिरसा, कोसवण, सावकी पाळे या गावांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून फळबागांचे महत्त्व पटवून देण्यात आले.यंदाचा दुष्काळ फळबागांसाठी कर्दनकाळ ठरू पाहत आहे. पाण्याचे भीषण संकट, दरदिवशी आटत चाललेले स्रोत यंदा बागा वाचतील की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कळवण तालुक्यात फळबागांचे क्षेत्र जवळपास ३०० हेक्टरवर विस्तारले आहे. त्यामध्ये द्राक्ष, डाळिंब, आंबा आदी फळपिकांच्या बागांचा समावेश आहे.शिवाय नव्याने झालेली लागवडही पाणी कमतरतेमुळे संकटात सापडली आहे. टॅँकरने पाणी आणून बागा जगविण्यासाठीची आर्थिक क्षमता फारच थोड्या शेतकऱ्यांकडे आहे. शिवाय दरदिवशी आटत चालेल्या जलस्रोतांमुळे त्यांनाही दूरवरून किती पाणी आणून बागांना घालायचे यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणी सूक्ष्म सिंचन तंत्राचा उपयोग करून बागा वाचविता येतील का यासाठी कृषी विभागाने फळबागा वाचवा अभियान हाती घेतले आहे.झाडांच्या वयोमानानुसार प्रतिझाड, प्रतिदिन सूक्ष्म सिंचनाद्वारे नेमके किती लिटर पाणी लागते याची माहिती फळबाग वाचवा अभियानाच्या माध्यमातून फळबागायत दारांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. शिवाय दीर्घ मुदतीसाठी करावयाच्या उपाययोजना माहिती पत्रकाच्या रूपाने फळबागायतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून केले जात आहे.सध्याचा दुष्काळी परिस्थितीत फळबाग वाचविण्यासाठी कृषी विभागामार्फत अभियान राबविण्यात येत आहे. कृषी सहायकांमार्फत प्रत्येक गावात शेतकºयांचे मेळावे घेऊन प्रात्यक्षिकद्वारे मार्गदर्शन करण्यात येत असून, शेतकºयांनी आच्छादन वापर, मडका सिंचन, बोर्डी पेस्ट वापर आदी उपाययोजनांचा वापर करावा.- विजय पाटील, तालुका कृषी अधिकारी, कळवण