शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने आणलेली कृषी विधेयके रद्द करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:12 IST

नाशिक : केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायद्यांसदर्भातील विधेयके शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत हे कृषी सुधारणा विधेयके केंद्र ...

नाशिक : केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायद्यांसदर्भातील विधेयके शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत हे कृषी सुधारणा विधेयके केंद्र सरकारने तत्काळ रद्द करण्याची मागणी छावा क्रांतिवीर संघटनेने केली आहे. त्याचप्रमाणे हे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनासोबतच देशभरात मंगळवारी (दि.८) होणाऱ्या भारत बंदलाही छावा क्रांतिवीर संघटनेचा पाठिंबा असल्याची माहिती संघटनेचे संस्थांपक अध्यक्ष करण गायकर यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील उत्पादन आणि व्यापारासंदर्भात नवीन सुधारणा विदेयके मंजूर केले आहेत. परंतु पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी ही विधेयके शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत राजधानी दिल्लीला घेराव घालत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेतून कोणताही सकारात्मक तोडगा अद्याप निघू शकलेला नाही. त्यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि.८) भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत छावा क्रांतिवीर संघटनेने या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला असून, केंद्र सरकारने आणलेली विधत्के तत्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. या पत्राद्वारे, केंद्र सरकारने आणलेले विधेयके शेतकरी विरोधी व व्यापारीधार्जिणे असल्याचा आरोप केला आहे. भारत कृषिप्रधान देश असतानाही भारतातील शेतकरी देशोधडीला लागल्याचे नमूद करीत रकारने शेतकरीविरोधी निर्णय मागे घ्यावेत, अशी मागणीही या पत्राद्वारे केली आहे.