शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने आणलेली कृषी विधेयके रद्द करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:12 IST

नाशिक : केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायद्यांसदर्भातील विधेयके शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत हे कृषी सुधारणा विधेयके केंद्र ...

नाशिक : केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायद्यांसदर्भातील विधेयके शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत हे कृषी सुधारणा विधेयके केंद्र सरकारने तत्काळ रद्द करण्याची मागणी छावा क्रांतिवीर संघटनेने केली आहे. त्याचप्रमाणे हे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनासोबतच देशभरात मंगळवारी (दि.८) होणाऱ्या भारत बंदलाही छावा क्रांतिवीर संघटनेचा पाठिंबा असल्याची माहिती संघटनेचे संस्थांपक अध्यक्ष करण गायकर यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील उत्पादन आणि व्यापारासंदर्भात नवीन सुधारणा विदेयके मंजूर केले आहेत. परंतु पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी ही विधेयके शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत राजधानी दिल्लीला घेराव घालत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेतून कोणताही सकारात्मक तोडगा अद्याप निघू शकलेला नाही. त्यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि.८) भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत छावा क्रांतिवीर संघटनेने या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला असून, केंद्र सरकारने आणलेली विधत्के तत्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. या पत्राद्वारे, केंद्र सरकारने आणलेले विधेयके शेतकरी विरोधी व व्यापारीधार्जिणे असल्याचा आरोप केला आहे. भारत कृषिप्रधान देश असतानाही भारतातील शेतकरी देशोधडीला लागल्याचे नमूद करीत रकारने शेतकरीविरोधी निर्णय मागे घ्यावेत, अशी मागणीही या पत्राद्वारे केली आहे.