शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कर्मचाऱ्यांच्या उन्नतीसाठी करार

By admin | Updated: July 17, 2017 00:08 IST

नाशिक : गेल्या सोळा महिन्यांपासून रखडलेल्या करारामुळे राज्य परिवहन महामंडळातील १ लाख ८ हजार कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे

शिवाजी चव्हाण : एस. टी. कर्मचारी संयुक्त कृती समितीचा प्रादेशिक मेळावालोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या सोळा महिन्यांपासून रखडलेल्या करारामुळे राज्य परिवहन महामंडळातील १ लाख ८ हजार कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. करार हा कामगारांच्या उन्नतीचा मार्ग असून, यासाठी कृती समिती कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कामगार सेनेचे कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी केले.  कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतन कराराच्या पार्श्वभूमीवर शालिमार येथील शिवसेना भवन येथे नाशिक संयुक्त कृती संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर कामगार सेनेचे राज्य संघटक सचिव सुभाष जाधव, इंटकचे जी. आर. पाटील, श्रीरंग बरगे, मनसे कामगार संघटनेचे मोहन चावरे, कास्ट्राईबचे अरविंद जगताप, यांत्रिक संघटनेचे के. आर. टोंगळे उपस्थित होते.  यावेळी चव्हाण म्हणाले, करार हा कामगारांचा हक्क असून, करारामध्येच कर्मचाऱ्यांचे आर्थिक हित आहे. आयोगाप्रमाणे वेतनाची अपेक्षा करणे गैर असून, प्रशासनाने नाकारलेले असतानाही आयोगाची अपेक्षा करणे म्हणजे कामगारांचे नुकसान करण्यासारखे आहे. प्रशासन कराराच्या बाजूने असतानाही जर करारास विलंब होत असेल तर कामगार संघटना हे कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहे. कृती समितीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे चव्हाण यावेळी म्हणाले. याप्रसंगी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कृती समितीने प्रशासनाला सादर केलेल्या मसुद्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा, अशी अपेक्षा अनेक मान्यवरांनी भाषणातून व्यक्त केली.  करारास विलंब होत असेल तर त्याची जबाबदारी प्रशासनाने निश्चित केली पाहिजे. कामगार संघटना कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही यावेळी मान्यवरांनी केला.  इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील एस.टी. कामगारांचे वेतन हे ४५ ते ५० टक्के कमी  आहेत. याबाबत कामगार संघटनेकडून यापूर्वीच्या करारामध्ये काहीच केले नसल्याचा आरोपही करण्यात आला. वेतन आयोगानुसार नव्हे तर कराराच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे हित साधले जाईल, असा सूर मेळाव्यात उमटला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवा सांगळे यांनी केले. तर श्याम इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कृती समितीच्या १३ संघटनांचे प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते.