शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कर्मचाऱ्यांच्या उन्नतीसाठी करार

By admin | Updated: July 17, 2017 00:08 IST

नाशिक : गेल्या सोळा महिन्यांपासून रखडलेल्या करारामुळे राज्य परिवहन महामंडळातील १ लाख ८ हजार कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे

शिवाजी चव्हाण : एस. टी. कर्मचारी संयुक्त कृती समितीचा प्रादेशिक मेळावालोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या सोळा महिन्यांपासून रखडलेल्या करारामुळे राज्य परिवहन महामंडळातील १ लाख ८ हजार कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. करार हा कामगारांच्या उन्नतीचा मार्ग असून, यासाठी कृती समिती कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कामगार सेनेचे कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी केले.  कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतन कराराच्या पार्श्वभूमीवर शालिमार येथील शिवसेना भवन येथे नाशिक संयुक्त कृती संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर कामगार सेनेचे राज्य संघटक सचिव सुभाष जाधव, इंटकचे जी. आर. पाटील, श्रीरंग बरगे, मनसे कामगार संघटनेचे मोहन चावरे, कास्ट्राईबचे अरविंद जगताप, यांत्रिक संघटनेचे के. आर. टोंगळे उपस्थित होते.  यावेळी चव्हाण म्हणाले, करार हा कामगारांचा हक्क असून, करारामध्येच कर्मचाऱ्यांचे आर्थिक हित आहे. आयोगाप्रमाणे वेतनाची अपेक्षा करणे गैर असून, प्रशासनाने नाकारलेले असतानाही आयोगाची अपेक्षा करणे म्हणजे कामगारांचे नुकसान करण्यासारखे आहे. प्रशासन कराराच्या बाजूने असतानाही जर करारास विलंब होत असेल तर कामगार संघटना हे कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहे. कृती समितीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे चव्हाण यावेळी म्हणाले. याप्रसंगी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कृती समितीने प्रशासनाला सादर केलेल्या मसुद्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा, अशी अपेक्षा अनेक मान्यवरांनी भाषणातून व्यक्त केली.  करारास विलंब होत असेल तर त्याची जबाबदारी प्रशासनाने निश्चित केली पाहिजे. कामगार संघटना कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही यावेळी मान्यवरांनी केला.  इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील एस.टी. कामगारांचे वेतन हे ४५ ते ५० टक्के कमी  आहेत. याबाबत कामगार संघटनेकडून यापूर्वीच्या करारामध्ये काहीच केले नसल्याचा आरोपही करण्यात आला. वेतन आयोगानुसार नव्हे तर कराराच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे हित साधले जाईल, असा सूर मेळाव्यात उमटला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवा सांगळे यांनी केले. तर श्याम इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कृती समितीच्या १३ संघटनांचे प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते.