नाशिक : कांद्यासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत आधारभूत किंमत मिळावी, शेतकऱ्यांना येत असलेल्या अनंत अडचणी व त्यांना कर्जाच्या खाईतून मुक्त करण्यासाठी आॅगस्ट पासून शेतकरी संघटना देशभर तीव्र आंदोलन उभारणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रांतीक अध्यक्ष गुणवंत पाटील यांनी येथे दिली़हुतात्मा स्मारक येथे जिल्ह्णातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते़ पाटील म्हणाले, १९८० मध्ये शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन केले तशी पार्श्वभूमी आज तयार झाली आहे़ कांदा, साखर निर्यातबंदी, बाजारभावावर नियंत्रण, बाजार समित्यांमध्ये होणारी शेतकऱ्यांची लूट, गारपिटीनंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला मदतीच्या नावाखाली शासनाने पुसलेली पाने आणि आता निर्माण झालेली दुष्काळसदृश स्थिती यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे़ राज्य तसेच केंद्र शासनही शेतकऱ्यांसाठी काहीच करताना दिसत नाही़ यामुळे कांदा-बटाटा पिकांना जीवनावश्यक वस्तूंमधून वगळावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्जमुक्ती करावी, संपूर्ण वीजदेयक माफी करावी, इंडियन बँकर्स असोसिएशनच्या कर्जमाफ ीविरोधी भूमिकेचा निषेध, कांदा, कापूस, ऊस यासह विविध पिकांना आधारभूत किंमत मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन उभे करण्यात येणार आहे़ आंदोलनासाठी जिल्हा केंद्र ठरविण्यात आला असून, आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी ४ आॅगस्टला नाशिक येथे येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले़ याप्रसंगी शैलजा देशपांडे, माया पुसदकर, स्मिता गुरव, रामचंद्र पाटील, डॉ़ श्याम आष्टेकर, संतु पाटील झांबरे, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, बाबासाहेब गुजर, अॅड़ विलास देशमाने, हांबरे आदि उपस्थित होते़(प्रतिनिधी)
शेतकरी संघटना देशभर उभारणार तीव्र आंदोलन
By admin | Updated: July 22, 2014 00:58 IST