शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

शेतकरी संघटना देशभर उभारणार तीव्र आंदोलन

By admin | Updated: July 22, 2014 00:58 IST

गुणवंत पाटील : पिकांच्या आधारभूत किमतीसाठी लढा

नाशिक : कांद्यासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत आधारभूत किंमत मिळावी, शेतकऱ्यांना येत असलेल्या अनंत अडचणी व त्यांना कर्जाच्या खाईतून मुक्त करण्यासाठी आॅगस्ट पासून शेतकरी संघटना देशभर तीव्र आंदोलन उभारणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रांतीक अध्यक्ष गुणवंत पाटील यांनी येथे दिली़हुतात्मा स्मारक येथे जिल्ह्णातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते़ पाटील म्हणाले, १९८० मध्ये शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन केले तशी पार्श्वभूमी आज तयार झाली आहे़ कांदा, साखर निर्यातबंदी, बाजारभावावर नियंत्रण, बाजार समित्यांमध्ये होणारी शेतकऱ्यांची लूट, गारपिटीनंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला मदतीच्या नावाखाली शासनाने पुसलेली पाने आणि आता निर्माण झालेली दुष्काळसदृश स्थिती यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे़ राज्य तसेच केंद्र शासनही शेतकऱ्यांसाठी काहीच करताना दिसत नाही़ यामुळे कांदा-बटाटा पिकांना जीवनावश्यक वस्तूंमधून वगळावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्जमुक्ती करावी, संपूर्ण वीजदेयक माफी करावी, इंडियन बँकर्स असोसिएशनच्या कर्जमाफ ीविरोधी भूमिकेचा निषेध, कांदा, कापूस, ऊस यासह विविध पिकांना आधारभूत किंमत मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन उभे करण्यात येणार आहे़ आंदोलनासाठी जिल्हा केंद्र ठरविण्यात आला असून, आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी ४ आॅगस्टला नाशिक येथे येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले़ याप्रसंगी शैलजा देशपांडे, माया पुसदकर, स्मिता गुरव, रामचंद्र पाटील, डॉ़ श्याम आष्टेकर, संतु पाटील झांबरे, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, बाबासाहेब गुजर, अ‍ॅड़ विलास देशमाने, हांबरे आदि उपस्थित होते़(प्रतिनिधी)