नाशिक : तिरोडा-वरोरा या ४०० केव्ही वाहिनीच्या सर्कीट क्रमांक एक व दोनमध्ये काल सायंकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने अदानी वीज प्रकल्पातील ६६० मे.वॅटचे तीन संच बंद पडले होते. त्यामुळे या प्रकल्पातून तयार होणार्या विजेपैकी २००० मे.वॅट विजेची तूट निर्माण झाली. अचानक झालेल्या या तुटीमुळे राज्यातील विजेवर ताण आल्याने राज्यात तातडीचे भारनियमन करण्याची वेळ महावितरणवर आली. त्यामुळे दुपारच्या सुमारास राज्यात अनेक ठिकाणी तातडीचे भारनियमन करण्यात आले. वाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवरून पूर्ण करण्यात आले असून, काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.
्नराज्यात दुपारी झाले तात्पुरते भारनियमन
By admin | Updated: May 22, 2014 00:02 IST