शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
4
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
5
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
6
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
7
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
8
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
9
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
10
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
11
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
12
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
13
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
14
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
15
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
16
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
17
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
18
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
19
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
20
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला

एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांना दिलासा सायखेडा गावात बस दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:12 AM

सायखेडा : सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक कमकुवत ठरविलेल्या सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पुलावरून अवजड वाहतूक बंद केल्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. एक वर्षापासून बस गावात येत नसल्यामुळे आतुरतेने वाट पाहावी लागत असलेली बस अखेर गावात दाखल झाली आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बसचे स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्दे सायखेडा गावात बस दाखलएक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांना दिलासा

सायखेडा : सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक कमकुवत ठरविलेल्या सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पुलावरून अवजड वाहतूक बंद केल्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. एक वर्षापासून बस गावात येत नसल्यामुळे आतुरतेने वाट पाहावी लागत असलेली बस अखेर गावात दाखल झाली आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बसचे स्वागत करण्यात आले.पस्तीस-चाळीस गावांचे केंद्रस्थान असलेल्या सायखेडा येथे कांदा मार्केट, बाजारपेठेचे ठिकाण तसेच इतर अनेक उद्योगधंदे असून, या ठिकाणी नेहमीच आजूबाजूच्या गावातील लोकांची वर्दळ असते. गतवर्षी गोदावरीला आलेल्या पुरामुळे सायखेडा येथील जीर्ण झालेल्या पुलावरून बस वाहतूक बंद करण्यात आली होती. यात प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सायखेडा बसस्थानकाला बसचे मुखदर्शन झाल्याने प्रवासी वर्ग सुखावला आहे.येथून उच्च शिक्षण, व्यवसाय, नोकरीसाठी नाशिक किंवा इतरत्र जाणारे-येणारे प्रवासी, विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने नाशिक-सायखेडा बस पुलावरून लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी जोर धरून होती. बसचे दर्शन झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. सायखेडा बसस्थानकात बस दाखल होताच चालक, वाहक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जगन्नाथ कुटे, शिवनाथ कडभाने, सुनील कुटे, माणिक कुटे, अक्षय कुटे, महेश कुटे, भगवान कुटे, राहुल सांगळे, सागर कुटे, मनोज भुतडा, जितेंद्र रिपोटे, मदन बिरे, आदेश सानप, बाळासाहेब मुरकुटे, अमोल सानप आदींसह विद्यार्थी, प्रवासी, ग्रामस्थ उपस्थित होते.तीन वर्षांपूर्वी पायाभरणीबसस्थानकाच्या पायाभरणीचा शुभारंभ तीन-चार वर्षांपूर्वी झाला. नवीन बसस्थानक उभे राहते ना राहते तोच गतवर्षी महाड येथील दुर्घटनेनंतर जागे झालेल्या बांधकाम विभागाने सायखेडा गोदापात्राच्या जीर्ण झालेल्या पुलावरून बस वाहतुकीला बंदी घातली. त्यामुळे बºयाच कालावधीनंतर लाखो रु पये खर्च करून उभारण्यात आलेल्या नवीन बसस्थानकापर्यंत तब्बल वर्षभर बस फिरकली नसल्याने कधी स्थानकासाठी, तर कधी बससाठीची प्रतीक्षा करावी लागल्याने यात प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली होती.