शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पक्षांतर केलेल्या काही नगरसेवकांना पश्चातबुद्धी

By admin | Updated: January 26, 2017 00:18 IST

मनसेचा दावा : पुन्हा एण्ट्री न देण्याचा निर्णय

नाशिक : पक्ष सोडून गेलेल्या काही नगरसेवकांना पश्चातबुद्धी होत त्यांच्याकडून वेगवेगळ्या माध्यमातून पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी संपर्क साधला जात असल्याचा दावा मनसेचे संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांनी केला आहे. मात्र, पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही अभ्यंकर यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय मनसेने घेतला असून, सर्वच्या सर्व १२२ जागांसाठी मंगळवारपासून (दि. २४) ‘राजगड’ कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर, सोमवारी (दि. २३) मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन महापालिका निवडणुकीसाठी रणनीती निश्चित करण्यात आली. काही निर्णय घेण्यात येऊन प्रचारयंत्रणेचीही रूपरेषा ठरविण्यात आली. याचवेळी पक्ष सोडून गेलेल्या काही नगरसेवकांनी पुन्हा पक्षाकडे संपर्क साधत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचा मुद्दा चर्चेला आला. मात्र, पक्ष सोडून गेलेल्या एकाही नगरसेवकाला उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मनसेचे दरवाजे संबंधित नगरसेवकांना कायमचे बंद झाले असून सेना-भाजपात उमेदवारी न मिळाल्यास त्यांची स्थिती ‘ना घरका ना घाटका’ अशी होणार आहे. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवित अन्य पक्षातीलही काही इच्छुक उमेदवार पक्षाच्या संपर्कात असून, त्यातील काहींनी मुलाखतीला हजेरीही लावल्याचे अविनाश अभ्यंकर यांनी सांगितले.