शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
2
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
3
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
4
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
5
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
6
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
7
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...
8
नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...
9
IPL 2025: जोश हेझलवूडने RCB फॅनसोबत केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हालाही येईल राग
10
"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव
11
"मलाच धक्का बसलाय..." परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' सोडण्यावर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया
12
आणखी एक ज्योती? १२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी
13
Akhilesh Yadav : "भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा
14
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?
15
कोणीतरी आले अन् गोळ्या झाडून गेले! हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा अखेरची घटका मोजू लागला
16
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
17
अनंत अंबानींपेक्षाही मोठं लग्न? 'या' शाही विवाहात प्रत्येक पाहुण्यावर ४२ लाख होणार खर्च, २०० VIP
18
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
19
ब्रेकअप? 'या' अभिनेत्याला डेट करत होती सारा तेंडुलकर, कुटुंबाला भेटल्यानंतर नातं तुटल्याची चर्चा
20
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी

जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीनंतरही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:55 IST

नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु नव्याने बसविण्यात आलेली यंत्रसामग्री बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. अद्यापही जुन्याच यंत्राद्वारे पाणीपुरवठा होतो.

ठळक मुद्देकणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना ३५ लाखांचा खर्च पाण्यात गेल्याची भीती

नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु नव्याने बसविण्यात आलेली यंत्रसामग्री बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. अद्यापही जुन्याच यंत्राद्वारे पाणीपुरवठा होतो.योजना सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून सन २००४ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने योजना तयार झाल्यानंतर सुमारे १४ वर्षांपूर्वी पाणीपुरवठा समितीकडे हस्तांतरित करून दिली. गेल्या काही दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था झाल्याने तेथील यंत्रसामग्री व वाळू खराब झाली होती. तसेच अनेक वेळा अशुद्ध पाणीपुरवठासुद्धा होत होता. पाणीपुरवठा योजनेसाठी दर महिन्याला वीजबिल, कर्मचारी पगार, टी.सी.एल. पावडर, देखभाल दुरुस्ती यासाठी अंदाजे सव्वा लाख रु पये खर्च येतो. धरणातून पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आल्यानंतर टी.सी.एल. पावडरचे मिश्रण करतात व त्यानंतर पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.जलशुद्धीकरण केंद्राचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. किरकोळ कामे बाकी आहेत. पाणीपुरवठा समितीने पाणी शुद्ध होण्यासाठी लागणारे टी.सी.एल. पावडर व आलम यांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. नियमित वॉश आउट करणे गरजेचे आहे. शुद्धीकरण करूनच पाणीपुरवठा केला पाहिजे. पाणीपुरवठा समितीने यासंदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने सर्व मशीनरी बसविण्यात आली आहे.- ए. के. घुगे, शाखा अभियंताजलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित होता. गत महिन्यात वीजबिल भरणा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने बसविण्यात आलेल्या यंत्रसामग्रीची अद्याप चाचणी झालेली नाही. पाणी शुद्ध करणारे अनेक विद्युतपंप बंद आहेत. त्यामुळे पाणी व्यवस्थित शुद्ध होत नाही. याबाबत शाखा अभियंता व संबंधित ठेकेदार यांच्याकडे पंधरा दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. भोजापूर धरणावरील उद्भव विहीर व शुद्धीकरण केंद्र येथील सर्व वीजपंप सुरळीत करून समितीकडे द्यावे.- गोपाळ शेळकेसरपंच, नांदूरशिंगोटे