शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीनंतरही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:55 IST

नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु नव्याने बसविण्यात आलेली यंत्रसामग्री बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. अद्यापही जुन्याच यंत्राद्वारे पाणीपुरवठा होतो.

ठळक मुद्देकणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना ३५ लाखांचा खर्च पाण्यात गेल्याची भीती

नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु नव्याने बसविण्यात आलेली यंत्रसामग्री बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. अद्यापही जुन्याच यंत्राद्वारे पाणीपुरवठा होतो.योजना सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून सन २००४ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने योजना तयार झाल्यानंतर सुमारे १४ वर्षांपूर्वी पाणीपुरवठा समितीकडे हस्तांतरित करून दिली. गेल्या काही दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था झाल्याने तेथील यंत्रसामग्री व वाळू खराब झाली होती. तसेच अनेक वेळा अशुद्ध पाणीपुरवठासुद्धा होत होता. पाणीपुरवठा योजनेसाठी दर महिन्याला वीजबिल, कर्मचारी पगार, टी.सी.एल. पावडर, देखभाल दुरुस्ती यासाठी अंदाजे सव्वा लाख रु पये खर्च येतो. धरणातून पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आल्यानंतर टी.सी.एल. पावडरचे मिश्रण करतात व त्यानंतर पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.जलशुद्धीकरण केंद्राचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. किरकोळ कामे बाकी आहेत. पाणीपुरवठा समितीने पाणी शुद्ध होण्यासाठी लागणारे टी.सी.एल. पावडर व आलम यांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. नियमित वॉश आउट करणे गरजेचे आहे. शुद्धीकरण करूनच पाणीपुरवठा केला पाहिजे. पाणीपुरवठा समितीने यासंदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने सर्व मशीनरी बसविण्यात आली आहे.- ए. के. घुगे, शाखा अभियंताजलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित होता. गत महिन्यात वीजबिल भरणा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने बसविण्यात आलेल्या यंत्रसामग्रीची अद्याप चाचणी झालेली नाही. पाणी शुद्ध करणारे अनेक विद्युतपंप बंद आहेत. त्यामुळे पाणी व्यवस्थित शुद्ध होत नाही. याबाबत शाखा अभियंता व संबंधित ठेकेदार यांच्याकडे पंधरा दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. भोजापूर धरणावरील उद्भव विहीर व शुद्धीकरण केंद्र येथील सर्व वीजपंप सुरळीत करून समितीकडे द्यावे.- गोपाळ शेळकेसरपंच, नांदूरशिंगोटे