शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीनंतरही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:55 IST

नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु नव्याने बसविण्यात आलेली यंत्रसामग्री बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. अद्यापही जुन्याच यंत्राद्वारे पाणीपुरवठा होतो.

ठळक मुद्देकणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना ३५ लाखांचा खर्च पाण्यात गेल्याची भीती

नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु नव्याने बसविण्यात आलेली यंत्रसामग्री बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. अद्यापही जुन्याच यंत्राद्वारे पाणीपुरवठा होतो.योजना सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून सन २००४ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने योजना तयार झाल्यानंतर सुमारे १४ वर्षांपूर्वी पाणीपुरवठा समितीकडे हस्तांतरित करून दिली. गेल्या काही दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था झाल्याने तेथील यंत्रसामग्री व वाळू खराब झाली होती. तसेच अनेक वेळा अशुद्ध पाणीपुरवठासुद्धा होत होता. पाणीपुरवठा योजनेसाठी दर महिन्याला वीजबिल, कर्मचारी पगार, टी.सी.एल. पावडर, देखभाल दुरुस्ती यासाठी अंदाजे सव्वा लाख रु पये खर्च येतो. धरणातून पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आल्यानंतर टी.सी.एल. पावडरचे मिश्रण करतात व त्यानंतर पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.जलशुद्धीकरण केंद्राचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. किरकोळ कामे बाकी आहेत. पाणीपुरवठा समितीने पाणी शुद्ध होण्यासाठी लागणारे टी.सी.एल. पावडर व आलम यांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. नियमित वॉश आउट करणे गरजेचे आहे. शुद्धीकरण करूनच पाणीपुरवठा केला पाहिजे. पाणीपुरवठा समितीने यासंदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने सर्व मशीनरी बसविण्यात आली आहे.- ए. के. घुगे, शाखा अभियंताजलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित होता. गत महिन्यात वीजबिल भरणा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने बसविण्यात आलेल्या यंत्रसामग्रीची अद्याप चाचणी झालेली नाही. पाणी शुद्ध करणारे अनेक विद्युतपंप बंद आहेत. त्यामुळे पाणी व्यवस्थित शुद्ध होत नाही. याबाबत शाखा अभियंता व संबंधित ठेकेदार यांच्याकडे पंधरा दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. भोजापूर धरणावरील उद्भव विहीर व शुद्धीकरण केंद्र येथील सर्व वीजपंप सुरळीत करून समितीकडे द्यावे.- गोपाळ शेळकेसरपंच, नांदूरशिंगोटे