शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुणतांबेनंतर शेतकरी संपाचे नेतृत्व नाशकातून

By admin | Updated: June 4, 2017 03:06 IST

नाशिक : मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा राज्यव्यापी संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली

नाशिक : मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा राज्यव्यापी संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली असली तरी, नाशकात झालेल्या बैठकीत मात्र संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या संपाचे नेतृत्व पुणतांब्यातून नाशकात सरकल्याचे स्पष्ट झाले आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावरील नैताळे येथे शेतकऱ्यांनी बटाटे वाहून नेणाऱ्या वाहनाला लक्ष्य केल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. तर दुसरीकडे प्रशासनाने या संपाला तोंड देण्याची तयारी पूर्ण केली असून, पोलीस बंदोबस्तात शेतमालाचे १९८ मालट्रक बाहेरगावी रवाना केल्याचा दावा केला आहे.

शेतकरी संपाची धग जिल्ह्णात तिसऱ्या दिवशीही कायम असून, नाशिक बाजार समितीच्या आवारात शनिवारी सकाळी झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या संप माघारीच्या निर्णयास विरोध करून संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ठोस आश्वासन न घेता संप माघारीचा निर्णय घेणारे व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला गेलेले शेतकरी नेते जयराज सूर्यवंशी यांचा निषेधही यावेळी करण्यात आला. यावेळी संप मागे घेण्यासाठी शिष्टाई करण्यास गेलेले भाजपाचे स्थानिक खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे आदी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी कोणतीही चर्चा न करता त्यांना माघारी फिरण्यास भाग पाडले. शनिवारी दुपारी नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील नैताळे शिवारात बटाटे वाहून नेणाऱ्या वाहनाला संपकऱ्यांनी अडवून त्यातील बटाटे रस्त्यावर फेकल्याने संघर्ष निर्माण झाला. पोलिसांनी संपकऱ्यांना पिटाळून लावण्यासाठी सौम्य लाठीमार केल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली व काही वेळानंतर पोलीस मारहाणीचा निषेध करीत गावकऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर शेतकरी संघटनेची जेथे स्थापना झाली त्या निफाड तालुक्यातील रूई येथे राज्याचे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. विशेष म्हणजे जिल्ह्णात प्रथमच दिंडोरी तालुक्यातील शेतकरी महिला रस्त्यावर उतरल्या असून, नाशिक-गुजरात महामार्ग रोखून धरला. येवला तालुक्यातील भारम येथेही रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला, तर अनेक गावांमध्ये बंदसदृश परिस्थिती कायम आहे.