शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

पुणतांबेनंतर शेतकरी संपाचे नेतृत्व नाशकातून

By admin | Updated: June 4, 2017 03:06 IST

नाशिक : मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा राज्यव्यापी संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली

नाशिक : मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा राज्यव्यापी संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली असली तरी, नाशकात झालेल्या बैठकीत मात्र संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या संपाचे नेतृत्व पुणतांब्यातून नाशकात सरकल्याचे स्पष्ट झाले आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावरील नैताळे येथे शेतकऱ्यांनी बटाटे वाहून नेणाऱ्या वाहनाला लक्ष्य केल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. तर दुसरीकडे प्रशासनाने या संपाला तोंड देण्याची तयारी पूर्ण केली असून, पोलीस बंदोबस्तात शेतमालाचे १९८ मालट्रक बाहेरगावी रवाना केल्याचा दावा केला आहे.

शेतकरी संपाची धग जिल्ह्णात तिसऱ्या दिवशीही कायम असून, नाशिक बाजार समितीच्या आवारात शनिवारी सकाळी झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या संप माघारीच्या निर्णयास विरोध करून संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ठोस आश्वासन न घेता संप माघारीचा निर्णय घेणारे व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला गेलेले शेतकरी नेते जयराज सूर्यवंशी यांचा निषेधही यावेळी करण्यात आला. यावेळी संप मागे घेण्यासाठी शिष्टाई करण्यास गेलेले भाजपाचे स्थानिक खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे आदी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी कोणतीही चर्चा न करता त्यांना माघारी फिरण्यास भाग पाडले. शनिवारी दुपारी नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील नैताळे शिवारात बटाटे वाहून नेणाऱ्या वाहनाला संपकऱ्यांनी अडवून त्यातील बटाटे रस्त्यावर फेकल्याने संघर्ष निर्माण झाला. पोलिसांनी संपकऱ्यांना पिटाळून लावण्यासाठी सौम्य लाठीमार केल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली व काही वेळानंतर पोलीस मारहाणीचा निषेध करीत गावकऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर शेतकरी संघटनेची जेथे स्थापना झाली त्या निफाड तालुक्यातील रूई येथे राज्याचे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. विशेष म्हणजे जिल्ह्णात प्रथमच दिंडोरी तालुक्यातील शेतकरी महिला रस्त्यावर उतरल्या असून, नाशिक-गुजरात महामार्ग रोखून धरला. येवला तालुक्यातील भारम येथेही रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला, तर अनेक गावांमध्ये बंदसदृश परिस्थिती कायम आहे.