शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

पुणतांबेनंतर शेतकरी संपाचे नेतृत्व नाशकातून

By admin | Updated: June 4, 2017 03:06 IST

नाशिक : मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा राज्यव्यापी संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली

नाशिक : मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा राज्यव्यापी संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली असली तरी, नाशकात झालेल्या बैठकीत मात्र संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या संपाचे नेतृत्व पुणतांब्यातून नाशकात सरकल्याचे स्पष्ट झाले आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावरील नैताळे येथे शेतकऱ्यांनी बटाटे वाहून नेणाऱ्या वाहनाला लक्ष्य केल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. तर दुसरीकडे प्रशासनाने या संपाला तोंड देण्याची तयारी पूर्ण केली असून, पोलीस बंदोबस्तात शेतमालाचे १९८ मालट्रक बाहेरगावी रवाना केल्याचा दावा केला आहे.

शेतकरी संपाची धग जिल्ह्णात तिसऱ्या दिवशीही कायम असून, नाशिक बाजार समितीच्या आवारात शनिवारी सकाळी झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या संप माघारीच्या निर्णयास विरोध करून संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ठोस आश्वासन न घेता संप माघारीचा निर्णय घेणारे व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला गेलेले शेतकरी नेते जयराज सूर्यवंशी यांचा निषेधही यावेळी करण्यात आला. यावेळी संप मागे घेण्यासाठी शिष्टाई करण्यास गेलेले भाजपाचे स्थानिक खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे आदी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी कोणतीही चर्चा न करता त्यांना माघारी फिरण्यास भाग पाडले. शनिवारी दुपारी नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील नैताळे शिवारात बटाटे वाहून नेणाऱ्या वाहनाला संपकऱ्यांनी अडवून त्यातील बटाटे रस्त्यावर फेकल्याने संघर्ष निर्माण झाला. पोलिसांनी संपकऱ्यांना पिटाळून लावण्यासाठी सौम्य लाठीमार केल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली व काही वेळानंतर पोलीस मारहाणीचा निषेध करीत गावकऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर शेतकरी संघटनेची जेथे स्थापना झाली त्या निफाड तालुक्यातील रूई येथे राज्याचे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. विशेष म्हणजे जिल्ह्णात प्रथमच दिंडोरी तालुक्यातील शेतकरी महिला रस्त्यावर उतरल्या असून, नाशिक-गुजरात महामार्ग रोखून धरला. येवला तालुक्यातील भारम येथेही रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला, तर अनेक गावांमध्ये बंदसदृश परिस्थिती कायम आहे.