शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

अर्धशतकानंतरही ‘फकिरा’चे वाचकांवर गारुड

By admin | Updated: August 1, 2016 01:12 IST

अजरामर साहित्य : अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाचा आजही प्रभाव कायम

 मुकुंद बाविस्कर नाशिकथोर समाजसुधारक, बहुआयामी लेखक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी ३१ कादंबऱ्या, २२ कथासंग्रह, १६ लोकनाट्य व नाटके आदिंसह विपूल लेखन करीत मराठी वाङ्मयाच्या अनमोल खजिन्यात मोलाची भर टाकली आहे. त्यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीला वाचकांकडून अर्धशतकानंतरही मोठा प्रतिसाद मिळतो. परंतु नव समाजाने त्यांच्या समाजकार्याची फारशी दखल घेतली नाही किंबहुना अन्य समाजसुधारकांच्या तुलनेत त्यांची उपेक्षाच केली, अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले अण्णा भाऊ साठे यांचे कुठलेही औपचारिक शिक्षण झालेले नसताना मराठी साहित्याच्या इतिहास एक प्रख्यात लेखक झाले. अण्णा भाऊ यांचे लेखन दलित लेखकांच्या पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे ठरले. स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्यानंतरच्या काही काळातील महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे व संस्कृतीचे पहिले प्रमुख इतिवृत्तकारही मानले जातात. अण्णा भाऊ यांनी कादंबरी, कथासंग्रह, लोकनाट्य, नाटके, पद्य, प्रवासवर्णन अशी ७२ पुस्तके लिहिली. अण्णा भाऊंनी ज्या कालखंडात कादंबरी लेखनास सुरुवात केली. त्या कालखंडावर प्रख्यात कादंबरीकार ना. सी. फडके व वि. स. खांडेकर यांचा प्रभाव होता, परंतु त्या काळात नागरी जीवनाचे चित्रण त्या काळातील कादंबऱ्यात होते. अण्णा भाऊ यांनी सर्व प्रथम आपल्या लेखनात ग्रामीण, दीनदलित, शोषित आदि स्तरातील लोकांच्या जीवनाचे चित्रण केले. त्यानंतरही परंपरा मराठी साहित्यात सुरू झाली. अण्णा भाऊ यांनी १९५९ मध्ये लिहलेली फकिरा ही कादंबरी खूपच गाजली. आजच्या काळातही वाचक या कादंबरीच्या वाचनाला प्रथम पसंती देतात, असे वाचनालयातील नोंदीवरून दिसून येते.