शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

अर्धशतकानंतरही ‘फकिरा’चे वाचकांवर गारुड

By admin | Updated: August 1, 2016 01:12 IST

अजरामर साहित्य : अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाचा आजही प्रभाव कायम

 मुकुंद बाविस्कर नाशिकथोर समाजसुधारक, बहुआयामी लेखक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी ३१ कादंबऱ्या, २२ कथासंग्रह, १६ लोकनाट्य व नाटके आदिंसह विपूल लेखन करीत मराठी वाङ्मयाच्या अनमोल खजिन्यात मोलाची भर टाकली आहे. त्यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीला वाचकांकडून अर्धशतकानंतरही मोठा प्रतिसाद मिळतो. परंतु नव समाजाने त्यांच्या समाजकार्याची फारशी दखल घेतली नाही किंबहुना अन्य समाजसुधारकांच्या तुलनेत त्यांची उपेक्षाच केली, अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले अण्णा भाऊ साठे यांचे कुठलेही औपचारिक शिक्षण झालेले नसताना मराठी साहित्याच्या इतिहास एक प्रख्यात लेखक झाले. अण्णा भाऊ यांचे लेखन दलित लेखकांच्या पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे ठरले. स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्यानंतरच्या काही काळातील महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे व संस्कृतीचे पहिले प्रमुख इतिवृत्तकारही मानले जातात. अण्णा भाऊ यांनी कादंबरी, कथासंग्रह, लोकनाट्य, नाटके, पद्य, प्रवासवर्णन अशी ७२ पुस्तके लिहिली. अण्णा भाऊंनी ज्या कालखंडात कादंबरी लेखनास सुरुवात केली. त्या कालखंडावर प्रख्यात कादंबरीकार ना. सी. फडके व वि. स. खांडेकर यांचा प्रभाव होता, परंतु त्या काळात नागरी जीवनाचे चित्रण त्या काळातील कादंबऱ्यात होते. अण्णा भाऊ यांनी सर्व प्रथम आपल्या लेखनात ग्रामीण, दीनदलित, शोषित आदि स्तरातील लोकांच्या जीवनाचे चित्रण केले. त्यानंतरही परंपरा मराठी साहित्यात सुरू झाली. अण्णा भाऊ यांनी १९५९ मध्ये लिहलेली फकिरा ही कादंबरी खूपच गाजली. आजच्या काळातही वाचक या कादंबरीच्या वाचनाला प्रथम पसंती देतात, असे वाचनालयातील नोंदीवरून दिसून येते.