शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
5
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
6
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
7
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
8
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
9
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
10
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
11
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
12
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
13
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
14
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
15
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
16
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

अर्धशतकानंतरही ‘फकिरा’चे वाचकांवर गारुड

By admin | Updated: August 1, 2016 01:12 IST

अजरामर साहित्य : अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाचा आजही प्रभाव कायम

 मुकुंद बाविस्कर नाशिकथोर समाजसुधारक, बहुआयामी लेखक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी ३१ कादंबऱ्या, २२ कथासंग्रह, १६ लोकनाट्य व नाटके आदिंसह विपूल लेखन करीत मराठी वाङ्मयाच्या अनमोल खजिन्यात मोलाची भर टाकली आहे. त्यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीला वाचकांकडून अर्धशतकानंतरही मोठा प्रतिसाद मिळतो. परंतु नव समाजाने त्यांच्या समाजकार्याची फारशी दखल घेतली नाही किंबहुना अन्य समाजसुधारकांच्या तुलनेत त्यांची उपेक्षाच केली, अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले अण्णा भाऊ साठे यांचे कुठलेही औपचारिक शिक्षण झालेले नसताना मराठी साहित्याच्या इतिहास एक प्रख्यात लेखक झाले. अण्णा भाऊ यांचे लेखन दलित लेखकांच्या पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे ठरले. स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्यानंतरच्या काही काळातील महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे व संस्कृतीचे पहिले प्रमुख इतिवृत्तकारही मानले जातात. अण्णा भाऊ यांनी कादंबरी, कथासंग्रह, लोकनाट्य, नाटके, पद्य, प्रवासवर्णन अशी ७२ पुस्तके लिहिली. अण्णा भाऊंनी ज्या कालखंडात कादंबरी लेखनास सुरुवात केली. त्या कालखंडावर प्रख्यात कादंबरीकार ना. सी. फडके व वि. स. खांडेकर यांचा प्रभाव होता, परंतु त्या काळात नागरी जीवनाचे चित्रण त्या काळातील कादंबऱ्यात होते. अण्णा भाऊ यांनी सर्व प्रथम आपल्या लेखनात ग्रामीण, दीनदलित, शोषित आदि स्तरातील लोकांच्या जीवनाचे चित्रण केले. त्यानंतरही परंपरा मराठी साहित्यात सुरू झाली. अण्णा भाऊ यांनी १९५९ मध्ये लिहलेली फकिरा ही कादंबरी खूपच गाजली. आजच्या काळातही वाचक या कादंबरीच्या वाचनाला प्रथम पसंती देतात, असे वाचनालयातील नोंदीवरून दिसून येते.