शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

चार तासांनंतर गणरायांचे दर्शन दुर्लभ ! चोरांची भीती : सुरक्षिततेसाठी मौल्यवान मूर्ती कार्यकर्त्याच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 16:29 IST

श्याम बागुलनाशिक : श्री गणरायांची गणेश चतुर्थीला विधीवत प्रतिष्ठापना केल्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत मूर्तीची ज्याठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते तेथून ती हलविणे म्हणजे मूर्तीचे पावित्र्य भंग झाल्याचे धर्मशास्त्रात मानले जाते, मात्र नाशकातील मौल्यवान व किमती गणरायांना चोरांच्या भीतीने सार्वजनिक ठिकाणाहून दररोज सुरक्षिततेच्या कारणास्तव गणेशोत्सव काळात चक्क रात्रीच्या वेळी कार्यकर्त्याच्या घरात मुक्काम करावा ...

श्याम बागुलनाशिक : श्री गणरायांची गणेश चतुर्थीला विधीवत प्रतिष्ठापना केल्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत मूर्तीची ज्याठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते तेथून ती हलविणे म्हणजे मूर्तीचे पावित्र्य भंग झाल्याचे धर्मशास्त्रात मानले जाते, मात्र नाशकातील मौल्यवान व किमती गणरायांना चोरांच्या भीतीने सार्वजनिक ठिकाणाहून दररोज सुरक्षिततेच्या कारणास्तव गणेशोत्सव काळात चक्क रात्रीच्या वेळी कार्यकर्त्याच्या घरात मुक्काम करावा लागतो. कोणत्याच गणेशभक्तांना न आवडणारा हा निर्णय हिरावाडीतील नवजीवन कला-क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळातील कार्यकर्त्यांना छातीवर दगड ठेवून घ्यावा लागला आहे. त्यामागचे कारण म्हणजे पोलिसांनी मौल्यवान गणरायांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यास सपशेल नकार दिला आहे.सालाबादाप्रमाणे यंदाही नाशकात गणेशोत्सवाची धूम असून, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाºया मंडळांमध्ये ५६८ लहान व १९१ मोठे मंडळे सहभागी झाले आहेत. दरवर्षाप्रमाणे यावेळीही ३९ मौल्यवान व किमती गणरायांची मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यात बºयाचशा मंडळांनी मौल्यवान गणरायांच्या दागिन्यांमध्ये मोठी भर घालून त्यांचे मोल आणखीच वाढविले आहे. रविवार कारंजा येथील चांदीचे घडविलेले सिद्धिविनायक वगळता उर्वरित मौल्यवान गणरायांचे फक्त गणेशोत्सवाच्या काळातच आगमन होते. गणेशभक्तांसाठी या मौल्यवान गणरायांचे जसे आकर्षण असते तितकीच मूर्तीची काळजी संबंधित मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही घ्यावी लागते. दिवसा व रात्री त्यांना मंडळात जागता पहारा द्यावा लागतो, त्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात येते.शहरात उत्सवाच्या काळात पोलिसांचा जागता पहारा असतानाही चोºया,घरफोड्यांचे प्रमाण कायम असून, दिवसा व सायंकाळी घराबाहेर पडणाºया महिलांचे सौभाग्याचे लेणं सुखरूप राहिलेले नाही, अशा परिस्थितीत सार्वजनिक चौकात प्रतिष्ठापना केलेल्या मौल्यवान व किमती गणरायांची चोरांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस खात्याची असताना त्यांनी मात्र ही जबाबदारी टाळण्याची सपशेल भूमिका घेत एक प्रकारे चोरांपुढे नांगी टाकल्याचे वर्तन केले आहे. मौल्यवान गणरायांची प्रतिष्ठापना करणाºया मंडळांनीच प्रामुख्याने किमती मूर्तींचे चोरांपासून संरक्षण करावे, अशा सूचना देत त्यांच्यावर सुरक्षिततेची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यासाठी मौल्यवान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी पोलीस परवानगी घेण्यास जाणाºया मंडळांनाच धारेवर धरले जात असल्याने हिरावाडी येथील नवजीवन कला क्रीडा सांस्कृतिक सार्वजनिक मित्रमंडळाने त्यांच्या एक किलो चांदीच्या मूर्तीची गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना केली. परंतु अशी प्रतिष्ठापना करताना मंडळांच्या कार्यकर्त्यांनी धार्मिकता जोपासत ब्रह्मवृंदांशी सल्लामसलत करून दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंतच मूर्ती मंडपात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवता येईल अशा पद्धतीने धार्मिक पूजा अर्चा करून घेतली. चोरांच्या भीतीने रात्री ११ वाजता सार्वजनिक मंडपातून मूर्ती हलवून ती कार्यकर्त्यांच्या घरात ठेवली जाते व दुसºया दिवशी पुन्हा सायंकाळी ६ वाजता मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी खुली केली जात आहे.शहरातील सर्वच गणेश मंडळांना बंदोबस्त देण्यात आल्याचा दावा पोलीस यंत्रणेकडून केला जात असताना प्रत्यक्षात त्याचे वास्तव काही वेगळेच आहे. देव-देवताही नाशिक शहरात चोरांपासून सुरक्षित राहू शकत नाही यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते असू शकते?