शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

...पण गुढी उभारा अमावास्या समाप्तीनंतर

By admin | Updated: March 25, 2017 00:33 IST

नाशिक : येत्या २८ मार्चला गुढीपाडव्याला सकाळी ८.२७ वाजेपर्यंत अमावास्या असल्याने गुढीपाडवा साजरा करायचा की नाही, गुढी कधी उभारायची याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.

नाशिक : येत्या २८ मार्चला गुढीपाडव्याला सकाळी ८.२७ वाजेपर्यंत अमावास्या असल्याने गुढीपाडवा साजरा करायचा की नाही, गुढी कधी उभारायची याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, पंचांगकर्त्यांनी २८ मार्चलाच गुढीपाडवा साजरा करण्याचा खुलासा केला असून, गुढी मात्र सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनंतर अमावास्या समाप्तीनंतर उभारण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे. यंदा दि. २७ मार्च रोजी दर्श सोमवती अमावास्येस सकाळी १०.४४ वाजता प्रारंभ होऊन दि. २८ मार्च रोजी सकाळी ८.२७ वाजता अमावास्या समाप्ती होते. सर्वसाधारणपणे हिंदू पंचागानुसार सूर्याने पाहिलेली तिथी ग्राह्य धरली जाते. त्यामुळे अमावास्येच्या दिवशी गुढीपाडवा साजरा करायचा की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती. मात्र, दाते पंचांगकर्त्यांनी याबाबत स्पष्ट खुलासा करत दि. २८ मार्चलाच गुढीपाडवा साजरा करावा, असे म्हटले आहे. दाते पंचागानुसार, शके १९३९ या नूतन संवत्सराच्या पहिल्या दिवशी २८ मार्च रोजी मंगळवारी सूर्योदयानंतर सकाळी ८.२७ पर्यंत अमावास्या असून, प्रतिपदा क्षयतिथी आहे. प्रतिपदेची समाप्ती बुधवारच्या सूर्योदयापूर्वी पहाटे ५.४५ वाजता आहे. प्रतिपदेचा क्षय असल्याने मंगळवारी सकाळी ८.२७ नंतर म्हणजेच अमावास्या समाप्तीनंतर नूतन संवत्सरारंभ होईल. त्यामुळे दि. २८ मार्च रोजी सकाळी ८.२७ नंतर नेहमीप्रमाणे गुढी उभी करून गुढीपूजन व श्री गणपतीपूजन करावे. मात्र, सकाळी ८.२७ पूर्वी स्नान करून संध्या व देवपूजा करता येईल, असेही पंचागात स्पष्ट करण्यात आले आहे. सूर्यसिद्धांतीय गणित पद्धतीनुसार २८ मार्च रोजी प्रतिपदा तिथीचा क्षय होत नसल्याने उत्तरेकडील काशी आदि प्रदेशातील पंचांगात २९ मार्च रोजी गुढीपाडवा दिलेला आहे.  गणित पद्धतीतील भिन्नतेमुळे भारतामध्ये नूतन संवत्सराचे दोन दिवस असणार आहेत. मराठी माणसाचे पंचांग हे दृक्प्रत्ययी गणित पद्धतीचे असल्याने २८ मार्च रोजीच गुढीपाडवा साजरा करण्यात यावा. महाराष्ट्र, गुजरातसह भारतातील सर्व दृक्प्रत्ययी पंचांगांमध्ये व भारत सरकारच्या राष्ट्रीय पंचांगातदेखील गुढीपाडवा २८ मार्च रोजीच आहे.