शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

निवडणुकीनंतर देशात सत्तांतर अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:27 IST

सर्वच पातळींवर मोदी सरकार अपयशी ठरल्यामुळे देशात ‘संविधान बचाव, मोदी हटाव’ची चळवळ सुरू झाली आहे.

नाशिक : सर्वच पातळींवर मोदी सरकार अपयशी ठरल्यामुळे देशात ‘संविधान बचाव, मोदी हटाव’ची चळवळ सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे देशातील जनतेचा सध्याचा मूड पाहता आगामी निवडणुकीत देशात सत्तांतर अटळ असल्याचा दावा करून महाराष्टचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातही धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येण्याची तयारी सुरू झाली असल्यामुळे कॉँग्रेस प्रसंगी दोन पावले मागे टाकण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे.  दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आलेल्या चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या निवडणुकीत महाराष्टत दोन्ही कॉँग्रेस एकत्र लढली असती तर राज्यात वेगळे चित्र दिसले असते असे सांगून वेगळे लढूनही राज्यात दोन्ही कॉँगे्रसला ३५.२ टक्के मते मिळाली होती, भाजपापेक्षा ही मते अधिक होती. त्यामुळे आगामी निवडणूक दोन्ही कॉँग्रेस व धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येऊनच लढतील. ज्या ठिकाणी कॉँग्रेसची तयारी नाही अशा ठिकाणी जागा वाटपाबाबत तडजोड केली जाईल, असे चव्हाण म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आघाडी सरकारने मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते व त्याचा लाभही दोन्ही समाजाला मिळाला होता.मागासवर्गीय आयोगाचे कामकाज न्यायिक प्रक्रिया असून, त्यांनी दिलेला निर्णय दोन्ही बाजूंनी होऊ शकतो.  यदाकदाचित मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाच्या विरोधात निर्णय दिला तर सरकार काय करणार? त्यासाठी बी प्लॅन तयार आहे काय अशी विचारणाही त्यांनी केली. यावेळी आमदार सुधीर तांबे, माजीमंत्री शोभा बच्छाव, शरद अहेर, हेमलता पाटील, डॉ. तुषार शेवाळे, संपत सकाळे, उद्धव पवार, राहुल दिवे, ज्ञानेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते.आघाडी सरकारच्या अध्यादेशाला विरोध का?सप्टेंबर २०१४ मध्ये राज्यातील आघाडी सरकार बरखास्त झाले व त्यानंतर निवडणुका होऊन भाजपाची सत्ता आली. त्यामुळे सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीत मराठा आरक्षणाबद्दल न्यायालयात बाजू मांडण्याची जबाबदारी भाजपाची व पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला असे सांगून चव्हाण म्हणाले की, आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा जो अध्यादेश काढला होता, तोच आता फडणवीस सरकारने काढल्यामुळे त्यावेळी त्या अध्यादेशाला का विरोध करण्यात आला, असा सवाल चव्हाण यांनी केला.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण