शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आचारसंहितेनंतर शिक्षण क्षेत्रात भरती : तावडे

By admin | Updated: January 17, 2017 00:06 IST

शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापकांच्या बैठकीत आश्वासन

नाशिक : राज्यात सध्या सुरू असलेली २०१६-१७ ची संचमान्यता तथा शिक्षण समायोजन प्रक्रिया मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर राज्यातील विविध शाळांमध्ये रिक्त राहणाऱ्या पदांवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी परवानगी देण्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. नाशिकमधील दंत महाविद्यालयात सोमवारी (दि. १६) दुपारी जिल्हा मुख्याध्यापक संघटना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या विविध समस्या समजावून घेतल्या. तसेच विविध शिक्षण संस्थाचालकांचीही त्यांनी यावेळी बैठक घेतली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अपूर्व हिरे, माजीमंत्री प्रशांत हिरे, भाजपाचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे आदि उपस्थित होते. मुख्याध्यापक व संस्थाचालकांच्या दोन्ही बैठकांमध्ये शिक्षणमंत्र्यांसमोर नवीन शिक्षक भरतीची मागणी प्रामुख्याने मांडण्यात आली. त्यावर तावडे यांनी चिपळूणकर समिती आणि शासनाचा शिक्षक व शिककेतर भरतीप्रक्रियेसंबंधी नियमावलीतून सुवर्णमध्य काढून रिक्त जागांवर भरतीची मान्यता दिली जाऊ शकते, असे संकेत देतानाच संस्थाचालकांना ही पदे मनमानी पद्धतीने भरता येणार नसल्याचेही स्पष्ट केले. शासनस्तरावर झालेल्या निवड चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांमधूनच संस्थांना शिक्षकांची भरती करता येणार असल्याचे सांगितले. तसेच गंथपाल, प्रयोगशाळा सहायक यांच्या भरतीवर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यात पदवीधर मतदार संघ निवडणुकीसह जिल्हा परिषद तथा मनपा निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याचे सांगत बहुतेक प्रश्न व समस्यांवर ‘बघू, करू’ अशी आश्वासने तावडे यांनी दिली. ‘बरे बोलू की खरे बोलू’ मुख्याध्यापक व संस्थाचालकांसोबत झालेल्या दोन्ही बैठकांमध्ये शिक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांनी विविध निर्णय योग्यरीतीने शालेय संस्था तसेच शाळांपर्यंत पोहोचवला नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली, तर संस्थाचालकांनीच अधिक ाऱ्यांना अनावश्यक सवयी लावल्याचे सांगत संस्थाचालकांनाही खडे बोल सुनावले. विविध गैरप्रकारांना हद्दपार करून यातून होणाऱ्या बचतीतून आयटी, संस्थांचे लाइट, घरभाडे, कला, संगीत, क्रीडाशिक्षण खर्चात वाढ करणे शक्य असल्याचे तावडे यांनी सांगितले. परंतु केवळ समाधान व्हावे म्हणून वेगवेगळी आश्वासनांनी दिशाभूल करणे योग्य नसल्याचे सांगताना ‘बरे बोलू की, खरे बोलू’ अशी उक्ती वापरून संस्थाचालक, मुख्याध्यापकांची विश्वासार्हता मिळविण्याचा प्रयत्न केला.