शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मृत्युनंतर अनेकांच्या कुटुंबीयांनीही त्यांना नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनाबाधित नागरिकांच्या व्यथांना पारावार उरलेला नाही. कोरोना झाल्यानंतर रुग्णालय मिळण्यासाठीचा संघर्ष, कुणाला संघर्षानंतरही ऑक्सिजन बेड न मिळाल्याची ...

नाशिक : कोरोनाबाधित नागरिकांच्या व्यथांना पारावार उरलेला नाही. कोरोना झाल्यानंतर रुग्णालय मिळण्यासाठीचा संघर्ष, कुणाला संघर्षानंतरही ऑक्सिजन बेड न मिळाल्याची व्यथा तर कुठे बेड मिळूनही मृत्यू असे अनेकानेक प्रसंग दररोज घडत आहेत; मात्र काही नागरिक तर आपल्या कुटुंबीयांच्या मृतदेहालादेखील घेऊन जात नसल्याच्या घटना सातत्याने घडून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दरराेज किमान दोन-तीन अनोळखी किंवा नातेवाईक घेऊन न गेलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ स्मशानभूमीतील कंत्राटी कामगारांवर येत आहे.

कोरोना झालेल्या नागरिकाला काही अपवादात्मक परिस्थितीत अत्यंत वाईट अनुभवांचा सामनादेखील करावा लागतो. काही नागरिक तर कुणाला कोरोना झाल्याचे समजल्यानंतर त्याला फोन करायचेदेखील टाळतात. इतकी दहशत या कोरोनाच्या आजाराने निर्माण केली आहे. अशा प्रकारांमुळे कोरोना झालेल्या व्यक्ती आणि अन्य नातेवाइकांमध्ये नात्यातही दुरावा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही ठिकाणी संबंधित बाधिताचे निधन झाले, तर विषयच संपतो; मात्र काही नागरिक तर बरे झाल्यानंतरही त्यांची विचारणा केली नाही, म्हणूनदेखील रुसवे फुगवे घडले आहेत. तर काही वेळा नागरिकांचा मृत्यू झाल्यावर तर कुटुंबीय तो मृतदेह ताब्यातदेखील घेत नाहीत. अशावेळी मग संबंधित व्यक्तीचा मृतदेह काही दिवस पडून राहिल्यानंतर मग त्याच्यावर मनपाच्यावतीने किंवा जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांद्वारे अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.

इन्फो

बिटकोसह जिल्हा रुग्णालयातही अनेक प्रकार

नाशिकरोडच्या बिटकोसह जिल्हा रुग्णालयातही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. नातेवाईक विचारणा करतील, यासाठी काही दिवस बॉडीदेखील शवागारात ठेवली; मात्र तरीही कुणीच न आल्यामुळे त्या मृतदेहांवर कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

इन्फो

काहींच्या नशिबी एकही नातेवाईक नाही

शासकीय निर्बंधांमुळे केवळ पाच नातेवाइकांच्या उपस्थितीतच अंत्यसंस्कार केले जातात; मात्र काहींच्या नशिबी तर एकही नातेवाईकदेखील नसल्याची वेळ या कोरोनाने आणली आहे. काही रुग्णांना तर बेड मिळत नसल्याने नदीकिनारी कुठेही जागा मिळेल तिथे कंत्राटी कामगारांकडून अंत्यसंस्कार उरकले जातात.

कोट

अनेकदा नातेवाईक बरोबर नसतात, अनेकदा काही नातेवाईक मृताच्या जवळदेखील येत नाहीत. त्या परिस्थितीत आम्हालाच अंत्यसंस्कार करावे लागतात.

दिनेश कटारे, कंत्राटी कामगार.

------------------

(ही डमी आहे.)