शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

...अखेर कलानगरचा वीजपुरवठा सुरळीत

By admin | Updated: June 14, 2014 01:59 IST

इंदिरानगर : अखेर कलानगरचा वीजपुरवठा सुरळीत

इंदिरानगर : येथील कलानगर बसथांब्यानजीक असलेल्या रोहित्रामधील बिघाड महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत केल्याने गेल्या महिनाभरापासून सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या रहिवासी व व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. कलानगर परिसर तसेच मैत्रविहार, राजलक्ष्मी, ईश्वर पार्क, गगनप्रभा, ओमकार यांसह परिसरातील सोसायट्यांमधील रहिवासी तसेच व्यावसायिक गेल्या महिनाभरापासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त झाले होते. ऐन उन्हाळ्यात दिवसा तसेच रात्रीच्या वेळी अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले होते. याबाबत नागरिकांनी अनेकदा महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते; परंतु कर्मचारी येऊन तात्पुरता वीजपुरवठा सुरळीत करीत व यानंतर पुन्हा वीज गायब होत होती. गुरुवारी सकाळी येथील रहिवासी व व्यावसायिक जमा झाले. यानंतर त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली व सदर रोहित्र त्वरित दुरुस्त करावे, असे सांगितले. यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी नितीन पगारे यांनी तत्काळ दखल घेत रोहित्रामधील झालेला बिघाड दुरुस्त केला. यामुळे खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आज अधिकाऱ्यांनी पुन्हा पाहणी केली. यावेळी परिसरातील शरद निकम, जितेंद्र मोरे, विकास मगर, भदाणे, चंद्रकांत ठोसर, राज बन्द्रे, भुरे, प्रकाश मेघने, बापू कापसे, श्रीवास्तव, शैलेश पटेल, विराणी, शिंदे आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)