शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

४६ दिवसांनी केंद्रीय मंत्री भारती पवार परतल्या कर्मभूमीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:17 IST

पालघर ते नंदुरबार जनआशीर्वाद यात्रा आटोपून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या कळवण तालुका ...

पालघर ते नंदुरबार जनआशीर्वाद यात्रा आटोपून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या कळवण तालुका दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी डॉ. पवार यांनी सांगितले की, केंद्र सरकारने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना महामारीच्या संकटात मोठे काम उभे केले असून, देशातील ५५ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण केले आहे. असे काम करणारा भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे. तसेच सामान्य महिलांना उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून न्याय दिला आहे तसेच शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना लागू केली आहे. कष्टकरी, शेतकरी, कामगार यांचेही प्रश्न सोडविण्यासाठी माझ्यासारख्या आदिवासी समाजातील अनेक कार्यकर्त्यांना संधी दिल्याचेही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते सुधाकर पगार हे होते. यावेळी कळवण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पवार यांचे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, शहराध्यक्ष निंबा पगार, महिला अध्यक्ष सोनाली जाधव, गोविंद कोठावदे, विकास देशमुख, सचिन सोनवणे, दीपक वेढणे, सतीश पगार, हितेंद्र पगार, प्रवीण रौंदळ व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक विकास देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. किशोर पगार यांनी केले.

इन्फो

सप्तशृंगी देवीचरणी नतमस्तक

मंत्रिपद मिळाल्यानंतर डॉ. भारती पवार या पहिल्यांदाच कळवण तालुका दौऱ्यावर आल्या होत्या. आपल्या मायभूमीत सत्कार स्वीकारत त्यांनी सप्तशृंगी देवीच्या गडावर जाऊन पहिल्या पायरीचे दर्शन घेतले. कोरोनापासून संपूर्ण देशाला मुक्ती मिळू दे, असे साकडे यावेळी त्यांनी सप्तशृंगी देवीला घातले. दरम्यान, मतदारसंघाच्याही विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

फोटो- २१ कळवण भारती पवार

कळवण येथे आयोजित सत्कार साेहळ्यात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार. समवेत व्यासपीठावर उपस्थित भाजपचे पदाधिकारी.

210821\21nsk_40_21082021_13.jpg

फोटो- २१ कळवण भारती पवार