शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अकरावीतील सर्व विद्यार्थ्यांना सरसकट बारावीत प्रवेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राज्यात सध्या कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असून बारावीच्या परीक्षा परीक्षा तोंडावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : राज्यात सध्या कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असून बारावीच्या परीक्षा परीक्षा तोंडावर तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे अकरावीच्या परीक्षा घेणे अवघड झाले असल्याने अकरावीतील सर्व विद्यार्थ्यांना सरसकट बारावीमध्ये प्रवेश देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे .

राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण

करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाचे शिक्षकांनी स्वागत केले आहे. त्यासोबतच आता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत विविध शिक्षक संघटनांकडून व्यक्त होत असताना महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पुढाकार घेत अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट बारावीत प्रवेश देण्याच्या मागणीसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र पाठविले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे यांनी दिली आहे.

अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक महासंघाने यावर्षी अकरावीचे प्रवेश उशिरा झाल्याचे कारण देतानाच प्रत्यक्ष ऑफलाईन अध्यापन कमी प्रमाणात झाले असल्याचेही नमूद केले आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने अध्यापन शिक्षकांनी केले. मात्र नेटवर्क अभावी व इतर तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी त्यापासून वंचित राहिल्याचेही या पत्रात अधोरेखित करतानाच सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असताना व बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असतांना अकरावीच्या परीक्षा घेणे अवघड असल्याचे पत्र शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे, सचिव प्रा. संतोष फाजगे व समन्वयक प्रा.मुकुंद आंदळकर यांनी शिक्षण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

इन्फो-

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी ही दिली कारणे

१)सरकारने संचारबंदी किंवा जमावबंदी लागू केल्याने विद्यार्थी परीक्षेला बसू शकत नाही.

२) अनेक शाळा/ महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी देखील कोरोनाग्रस्त आहेत.

त्यामुळे ११वी च्या परीक्षा भयग्रस्त व तणावग्रस्त वातावरणात घेणे योग्य

नाही.

३) अकरावीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना १७ नंबर फॉर्म भरून बारावीत प्रवेश देण्याचे धोरण आहे. त्यामुळे पहिली ते आठवी प्रमाणेच अकरावीतील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण जाहीर करून बारावीत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे.