शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएसमधून प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:13 IST

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये १२ हजार ३०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर अजूनही तब्बल १२ ...

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये १२ हजार ३०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर अजूनही तब्बल १२ हजार ९७० जागा रिक्त असताना या रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविताना एसईबीसी प्रवर्गातील विद्यर्थ्यांना ईडब्लूएस प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्यामुळे गुरुवारी (दि. २४) डिसेंबर रोजी जाहीर होणारे यादी पुढे ढकलण्यात आली असून विशेष फेरीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण विभागाने दिली आहे.

राज्य सरकारने बुधवारी (दि. २३) एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रवर्गाचा लाभ देण्यास मान्यता दिली. त्यानुसार एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्लूएस किंवा सर्वसाधारण प्रवर्ग निवडण्यासाठी अकरावीच्या ऑनालाइन प्रवेश प्रक्रिया पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र विशेष फेरीचे महाविद्यालय वाटप स्थगित करण्यात आले असून यासंबंधीचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. परंतु, आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत त्यांना २६ डिसेंबरपर्यंत प्रवर्ग बदलण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना भाग एक भरून लॉक करणे, पडताळणी करून घेणे तसेच पूर्वी घेतलेला प्रवेश रद्द करून विशेष फेरीसाठी तत्काळ अर्ज करण्याची प्रक्रिया करता येणार आहे. त्यानंतर २७ डिसेंबरला प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, अर्जाचा भाग दोन भरणे, निवडलेल्या पर्यायांमध्ये बदल करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, या फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांने ऑनलाइन संमतिपत्र देणे बंधनकारक असल्याची सूचना विभागीय शिक्षण संचालकांनी केली आहे.