शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आजपासून आरटीईअंतर्गत ४५० शाळांमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:11 IST

नाशिक : कोरोना संकटामुळे अन्य क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून, लॉटरी जाहीर झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून ...

नाशिक : कोरोना संकटामुळे अन्य क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून, लॉटरी जाहीर झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून रखडलेली जिल्ह्यातील ४५० शाळांमधील आरटीई प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून (दि. ११) पुन्हा सुरू होणार आहे. आरटीई अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४५४४ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ७ एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीत जिल्ह्यातून अर्ज करणाऱ्या १३ हजार ३३० विद्यार्थ्यांपैकी ४ हजार २०८ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून एसएमएसही प्राप्त झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना लॉटरीत प्रवेशाची संधी मिळूनही कोरोनामुळे प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा होती. अखेर विद्यार्थ्यांसह पालकांचीही प्रतीक्षा संपुष्टात आली असून, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे ठप्प झालेली प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. या प्रवेशप्रक्रियेला गती देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याबाबतचा निर्णय आपल्या स्तरावरून घेण्यात यावा, असे शिक्षण संचालकांनी म्हटले आहे. दरम्यान, लॉटरीच्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता २० दिवसांचा कालावधी देण्यात आला असून, निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेेेे.

इन्फो-

जिल्ह्यातील आरटीई प्रवेशप्रक्रियेची स्थिती

जिल्ह्यातील शाळा - ४५०

उपलब्ध जागा - ४५४४

विद्यार्थ्यांचे प्राप्त अर्ज - १३, ३३०

निवड झालेले विद्यार्थी - ४२०८