शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

प्रशासन तणावाखाली : आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींमुळे साधुग्राम तापले

By admin | Updated: August 25, 2015 00:07 IST

कुंभमेळ्यात संघर्षाचा ‘आखाडा’

नाशिक : कुंभमेळ्यातील प्रथम शाहीस्नान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले असताना, प्रमुख साधू-महंतांमध्ये मात्र संघर्षाचा आखाडा रंगला आहे. सोमवारी दिवसभर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्याने या वादांनी आणखी गंभीर स्वरूप धारण केले असून, यामुळे प्रशासन मात्र प्रचंड तणावाखाली आले आहे. गेल्या शुक्रवारी चतु:संप्रदाय आखाड्याच्या ध्वजारोहणाच्या वेळी साधू-महंतांतील वाद उफाळून आला होता. दिगंबर अनी आखाड्याचा पंचरंगी ध्वज न फडकावल्याने या आखाड्याने सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता; मात्र या आखाड्याचे तीन खालसे मात्र सोहळा पूर्ण होईपर्यंत थांबून राहिले होते.  त्यांच्या या कृतीमुळे दिगंबर अनी आखाड्याचा अपमान झाल्याचे सांगत रविवारी आखाड्याचे श्री महंत कृष्णदासजी महाराज, श्री महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी आपल्या अंतर्गत खालशांची बैठक बोलावली होती. महंत माधोदास यांच्या सूचनेवरून संबंधित तिन्ही खालशांना कुंभमेळ्यातून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याशिवाय रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत ग्यानदास यांचे अध्यक्षपदही अमान्य केले होते. या प्रकरणाचे तीव्र पडसाद सोमवारी उमटले. श्री महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करीत महंत ग्यानदास यांच्यावरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. महंत ग्यानदास यांचे समर्थन त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांनी यापूर्वीच काढले असून, आता दिगंबर अनी या मुख्य आखाड्यानेही हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे सध्या आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावर कोणीही नाही. पुढच्या वर्षी तेरा आखाडे एकत्र येऊन नव्या अध्यक्षांची निवड करणार असल्याचे ते म्हणाले. बहिष्कृत केलेल्या खालशांनी माफी मागितल्यास त्यांच्याबाबत पुनर्विचार होऊ शकेल, असेही ते म्हणाले. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली असून, काही अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश येऊ शकले नसल्याचे वृत्त आहे.जोड आहे...