शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

प्रशासनाला पाणी कपातीची आशा

By admin | Updated: October 31, 2015 00:16 IST

जायकवाडी पाणी वाद : आदेशाची प्रतीक्षा

नाशिक : जायकवाडीसाठी नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळताना फक्त पिण्यासाठीच पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्णातील धरणांमधून यापुढे कमी पाणी सोडावे लागण्याची आशा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. दोन आठवड्यापूर्वी महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत नाशिक व नगर जिल्ह्यातून सुमारे १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यात नाशिक जिल्ह्णातील गंगापूर व गिरणा खोऱ्यातून ४.३६ टीएमसी पाणी सोडावे लागणार असल्याने त्याविरोधात सर्वपक्षीय विरोध करण्यात आला, तर नगरच्या पाण्याबाबत थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेची शुक्रवारी सुनावणी होऊन न्यायालयाने याचिका फेटाळल्या परंतु जायकवाडीसाठी फक्त पिण्यासाठी पाणी सोडा, असे आदेश दिले आहेत. यापूर्वी जायकवाडी धरणात सोडण्यात येणारे पाणी पिण्यासाठी व सिंचन तसेच उद्योगासाठी सोडण्यात येणार होते, आता न्यायालयाने फक्त पिण्यासाठीच पाणी सोडा असे सांगितल्यामुळे जायकवाडी धरणात पिण्यासाठी किती पाणी लागेल याचा आढावा घेतला जाईल व तितकेच पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे साहजिकच जिल्ह्यातील धरणातून कमी पाणी सोडावे लागेल अशी आशा आहे; मात्र अद्याप न्यायालयाचा निकाल हाती न लागल्यामुळे किती पाणी सोडायचे याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सांगितले.