शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

प्रशासन सुस्त : सेतू केंद्रचालक मेटाकुटीस

By admin | Updated: May 31, 2017 00:59 IST

सर्व्हर डाउनमुळे तीन हजार दाखले पडून

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या महिन्यापासून धीम्या गतीने चालणाऱ्या महाआॅनलाइन या शासकीय दाखले तयार करणाऱ्या सॉफ्टवेअरचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे सुमारे तीन हजारांहून अधिक शासकीय दाखले सेतू व महा ई सेवा केंद्रचालकांकडे पडून असून, त्यातच मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थी, पालकांची दाखल्यांसाठी होणारी गर्दी पाहता, त्यामानाने जिल्हा प्रशासन सुस्त आहे.शाळा व महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्न, जात, नॉनक्रिमीलेअर, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व अशा विविध दाखल्यांची गरज आहे. बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी दाखले मिळविण्यासाठी बुधवारपासून विद्यार्थी व पालकांची गर्दी होणार असताना प्रत्यक्षात गेल्या महिन्यापासून शासनाच्या ‘महाआॅनलाइन’चे सर्व्हर डाउन झाल्याने त्यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे सेतू व महा ई सेवा या केंद्रचालकांकडे तीन हजार दाखले पडून आहेत. सर्व्हर डाउन झाल्यामुळे दाखले तयार करण्यास विलंब होत असून, दिवसाकाठी दहा ते बारा दाखल्यांचीच नोंदणी या सर्व्हरमध्ये होत आहे. त्यामुळे जुने दाखलेच अद्याप तयार नसताना बुधवारपासून हजारोच्या संख्येने दाखल्यांसाठी अर्ज सादर झाल्यास काय करायचे, असा प्रश्न केंद्रचालकांना पडला आहे. गेल्या महिन्यापासून यासंदर्भात केंद्रचालकांनी महाआॅनलाइनच्या जिल्हा समन्वयकापासून ते थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत याबाबत तक्रारी केल्या असल्या तरी त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. असाच प्रकार राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये घडल्यानंतर तेथील जिल्हा प्रशासनाने सेतू केंद्रचालकांना त्यांच्या जुन्या सॉफ्टवेअरमध्ये काम करण्याची मुभा दिली होती. नाशिक जिल्हा प्रशासन मात्र यासंदर्भात सुस्त असून, येणाऱ्या काळात शासकीय दाखल्यांसाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्यावर काहीच कार्यवाही करण्यास तयार नसल्याची तक्रार केली जात आहे. बारावीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर दहावीचाही निकाल जाहीर होणार असून, काही शाखांमध्ये प्रवेशासाठी ३ जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना वेळेत दाखले देण्याची व्यवस्था करणे क्रमप्राप्त असून, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी सेतू व महा ई सेवा केंद्रचालकांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे गेल्या तीन आठवड्यांपासून दाखल्यांसाठी अर्ज सादर केलेल्या पालकांचा तगादा वाढला आहे.