शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

प्रशासन सुस्त : सेतू केंद्रचालक मेटाकुटीस

By admin | Updated: May 31, 2017 00:59 IST

सर्व्हर डाउनमुळे तीन हजार दाखले पडून

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या महिन्यापासून धीम्या गतीने चालणाऱ्या महाआॅनलाइन या शासकीय दाखले तयार करणाऱ्या सॉफ्टवेअरचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे सुमारे तीन हजारांहून अधिक शासकीय दाखले सेतू व महा ई सेवा केंद्रचालकांकडे पडून असून, त्यातच मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थी, पालकांची दाखल्यांसाठी होणारी गर्दी पाहता, त्यामानाने जिल्हा प्रशासन सुस्त आहे.शाळा व महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्न, जात, नॉनक्रिमीलेअर, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व अशा विविध दाखल्यांची गरज आहे. बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी दाखले मिळविण्यासाठी बुधवारपासून विद्यार्थी व पालकांची गर्दी होणार असताना प्रत्यक्षात गेल्या महिन्यापासून शासनाच्या ‘महाआॅनलाइन’चे सर्व्हर डाउन झाल्याने त्यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे सेतू व महा ई सेवा या केंद्रचालकांकडे तीन हजार दाखले पडून आहेत. सर्व्हर डाउन झाल्यामुळे दाखले तयार करण्यास विलंब होत असून, दिवसाकाठी दहा ते बारा दाखल्यांचीच नोंदणी या सर्व्हरमध्ये होत आहे. त्यामुळे जुने दाखलेच अद्याप तयार नसताना बुधवारपासून हजारोच्या संख्येने दाखल्यांसाठी अर्ज सादर झाल्यास काय करायचे, असा प्रश्न केंद्रचालकांना पडला आहे. गेल्या महिन्यापासून यासंदर्भात केंद्रचालकांनी महाआॅनलाइनच्या जिल्हा समन्वयकापासून ते थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत याबाबत तक्रारी केल्या असल्या तरी त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. असाच प्रकार राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये घडल्यानंतर तेथील जिल्हा प्रशासनाने सेतू केंद्रचालकांना त्यांच्या जुन्या सॉफ्टवेअरमध्ये काम करण्याची मुभा दिली होती. नाशिक जिल्हा प्रशासन मात्र यासंदर्भात सुस्त असून, येणाऱ्या काळात शासकीय दाखल्यांसाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्यावर काहीच कार्यवाही करण्यास तयार नसल्याची तक्रार केली जात आहे. बारावीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर दहावीचाही निकाल जाहीर होणार असून, काही शाखांमध्ये प्रवेशासाठी ३ जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना वेळेत दाखले देण्याची व्यवस्था करणे क्रमप्राप्त असून, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी सेतू व महा ई सेवा केंद्रचालकांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे गेल्या तीन आठवड्यांपासून दाखल्यांसाठी अर्ज सादर केलेल्या पालकांचा तगादा वाढला आहे.