शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बाहेर पडणाऱ्यांमुळे प्रशासनही चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:12 IST

नाशिक : कोरोना नियंत्रणात येत असताना नागरिकांनीदेखील संयम दाखविणे अपेक्षित असल्याचे राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन ...

नाशिक : कोरोना नियंत्रणात येत असताना नागरिकांनीदेखील संयम दाखविणे अपेक्षित असल्याचे राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येऊनही सलग सुट्यांमुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या गर्दीने प्रशासनही चिंतेत आहे. इतर शहरातील अनेक पर्यटक नाशिकमध्ये दाखल झाल्याने कोरोनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्कता दाखविणे अपेक्षित असताना लोक घराबोहर पडल्यामुळे गर्दी आणि उत्सवावर नियंत्रण असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे. शहरात येणाऱ्या टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगांमुळे शहरात येणाऱ्यांची संख्या अचानक वाढली असल्याचे दिसते. याचा थेट परिणाम प्रशासकीय तसेच आरोग्य यंत्रणेवर होणार असून नाशिककरांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट किती मोठी असेल याबाबतची शाश्वती काहीच देता येत नसली तरी पहिल्यापेक्षा दीडपट अधिक लाट आली तरी प्रशासन त्याचा सामना करू शकेल, अशी तयारी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. मात्र नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली आहे. सध्या अडीचशे ते तीनशे रुग्ण दररोज आढळून येत आहेत. दाखल रुग्णांच्या संख्येत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने अजूनही दिलासादायक चित्र आहे. कोरोनाची भीती बऱ्यापैकी कमी झालेली आहे; परंतु संकट मात्र टळलेले नाही. अशा परिस्थितीत शहरात वाढलेली गर्दी प्रशासकीय यंत्रणेची डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. नागरिकांनी उगाच घराबाहेर पडू नये, सुरक्षितता नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. सामाजिक संकट म्हणून प्रत्येकाने जबाबदारी ओळखावी असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले होते. मात्र सलग सुट्यांमुळे वाढलेल्या गर्दीने प्रशासनाची धावपळ वाढण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय यंत्रणा तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी केारोनाशी लढत आहे. अशावेळी नागरिकांची साथदेखील महत्त्वाची असल्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्क वापरावा, सुरक्षित अंतराचे पालन करावे, हात स्वच्छ करण्यात यावे, सार्वजिनक ठिकाणी गर्दी करू नये असे वारंवार आवाहन करण्यात येते, मात्र नागरिकांचा बेजबाबदारपणा नेहमीच समोर येतो. सलग आलेल्या सुट्यांमुळेदेखील हेच चित्र दिसत आहे.