शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

बाहेर पडणाऱ्यांमुळे प्रशासनही चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:12 IST

नाशिक : कोरोना नियंत्रणात येत असताना नागरिकांनीदेखील संयम दाखविणे अपेक्षित असल्याचे राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन ...

नाशिक : कोरोना नियंत्रणात येत असताना नागरिकांनीदेखील संयम दाखविणे अपेक्षित असल्याचे राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येऊनही सलग सुट्यांमुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या गर्दीने प्रशासनही चिंतेत आहे. इतर शहरातील अनेक पर्यटक नाशिकमध्ये दाखल झाल्याने कोरोनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्कता दाखविणे अपेक्षित असताना लोक घराबोहर पडल्यामुळे गर्दी आणि उत्सवावर नियंत्रण असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे. शहरात येणाऱ्या टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगांमुळे शहरात येणाऱ्यांची संख्या अचानक वाढली असल्याचे दिसते. याचा थेट परिणाम प्रशासकीय तसेच आरोग्य यंत्रणेवर होणार असून नाशिककरांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट किती मोठी असेल याबाबतची शाश्वती काहीच देता येत नसली तरी पहिल्यापेक्षा दीडपट अधिक लाट आली तरी प्रशासन त्याचा सामना करू शकेल, अशी तयारी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. मात्र नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली आहे. सध्या अडीचशे ते तीनशे रुग्ण दररोज आढळून येत आहेत. दाखल रुग्णांच्या संख्येत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने अजूनही दिलासादायक चित्र आहे. कोरोनाची भीती बऱ्यापैकी कमी झालेली आहे; परंतु संकट मात्र टळलेले नाही. अशा परिस्थितीत शहरात वाढलेली गर्दी प्रशासकीय यंत्रणेची डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. नागरिकांनी उगाच घराबाहेर पडू नये, सुरक्षितता नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. सामाजिक संकट म्हणून प्रत्येकाने जबाबदारी ओळखावी असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले होते. मात्र सलग सुट्यांमुळे वाढलेल्या गर्दीने प्रशासनाची धावपळ वाढण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय यंत्रणा तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी केारोनाशी लढत आहे. अशावेळी नागरिकांची साथदेखील महत्त्वाची असल्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्क वापरावा, सुरक्षित अंतराचे पालन करावे, हात स्वच्छ करण्यात यावे, सार्वजिनक ठिकाणी गर्दी करू नये असे वारंवार आवाहन करण्यात येते, मात्र नागरिकांचा बेजबाबदारपणा नेहमीच समोर येतो. सलग आलेल्या सुट्यांमुळेदेखील हेच चित्र दिसत आहे.