शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

आवर्तनासाठी आदिवासींचे आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 01:08 IST

कळवण : बोरदैवत लघुपाटबंधारे प्रकल्पातून रब्बी पिकासाठी तत्काळ आवर्तन मिळावे या मागणीसाठी अंबिका ओझर येथील आदिवासी शेतकऱ्यांनी कळवण येथील लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी पाठिंबा दिला असून, तत्काळ पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचा पाठिंबा : गेट नादुरु स्त असल्याने पाणी सोडण्यास अडचणी

कळवण : बोरदैवत लघुपाटबंधारे प्रकल्पातून रब्बी पिकासाठी तत्काळ आवर्तन मिळावे या मागणीसाठी अंबिका ओझर येथील आदिवासी शेतकऱ्यांनी कळवण येथील लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी पाठिंबा दिला असून, तत्काळ पाणी सोडण्याची मागणी केली आहे.दरम्यान, लघुपाटबंधारे प्रकल्पाचे उपअभियंता अभिजित रौंदळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागण्यांसंदर्भात चर्चा केली. पाणी सोडण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले; परंतु गेट नादुरु स्त असल्याने पाणी सोडण्यात अडचणी निर्माण होत असल्याची माहिती समोर आली आहे.बोरदैवत लघुपाटबंधारे प्रकल्पातून दि. २४ व २५ जानेवारी रोजी रब्बी पिकासाठी पाणी सोडले होते; मात्र देवळी वणी व बोरदैवत येथील ग्रामस्थांनी जबरदस्तीने करून पाणी बंद केल्याने या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील अंबिका ओझर या गावाला पाणी पोहोचलेच नाही.अंबिका ओझरपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी पाटबंधारे विभागाने प्रयत्न केले; परंतु काही शेतकरी बांधवांनी अटकाव केल्याने पाणी पोहोच करण्यात पाटबंधारे विभाग अपयशी ठरला. अंबिका ओझर येथील आदिवासी शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत. रब्बीचे गहू, हरभरा, कांदा व भाजीपाला पिके केली आहेत. या पिकांना शेवटचे पाणी द्यावयाचे आहे. विहिरींनी तळ गाठल्याने पिकांना पाणी देणे शक्य नाही. म्हणून अंबिका ओझर येथील शेतकºयांनी पाण्याचे आवर्तन मिळण्यासाठी पाणी वापर संस्थेमार्फत पैसेही भरले आहेत. या पिकांना तत्काळ पाण्याची गरज आहे. पाणी सोडण्याच्या मागणीसाठी कळवण येथील लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर रामदास खिल्लारी, सरपंच गीताबाई खिल्लारी, इंदिराबाई भोये, मन्साराम गांगुर्डे, विक्र म भोये, पांडुरंग भोये, कांतिलाल भोये, पंढरीनाथ भोये, वामन भोये, रमेश बढावे, साहेबराव भोये, एकनाथ भोये, बुधा मांडवी, भाऊसाहेब भोये, रामचंद्र भोये, काशीराम जोपळे, विक्र म भोये यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. बोरदैवत लघु पाटबंधारे प्रकल्पाची क्षमता ५८ दशलक्ष घनफूट असून, आजमितीस २३ दशलक्ष घनफूट शिल्लक साठा आहे. पाणी सोडणे व बंद करण्यात गेट नादुरु स्त असल्याने अडचणी येतात. दि. २५ जानेवारी रोजी पाणी सोडले होते; मात्र स्थानिक नागरिकांनी दांडगाई करून पाणी बंद केले.- अभिजित रौंदळसहायक अभियंता, कळवण