शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

दिंडोरी, पेठ तालुक्यांत अतिरिक्त भारनियमन

By admin | Updated: May 29, 2014 16:30 IST

वीज वितरण कंपनीने अतिरिक्त भारनियमन सुरू केल्याने जनतेचे हाल

दिंडोरी : ऐन उन्हाळ््यात दिंडोरी व पेठ तालुक्यांत गेल्या आठ-दहा दिवसांपासून वीज वितरण कंपनीने अतिरिक्त भारनियमन सुरू केल्याने जनतेचे हाल होत असून, त्यातच सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. विजेचा बिघाड झाल्यास काही गावांना तर तीन-चार दिवस वीज गायब राहत असून, यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीज वितरण कंपनीने त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार धनराज महाले यांनी वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंता अजनाळकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे. दिंडोरी व पेठ तालुक्यांतील वीजपुरवठा समस्या सोडविण्यासाठी आमदार धनराज महाले यांनी आज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता अजनाळकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत निवेदन दिले. गेल्या आठ दिवसांपासून दिंडोरी, पेठ तालुक्यांत भारनियमनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, इतर वेळीही सातत्याने वीज खंडित होत आहे. यामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला असून, नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेवर विजेचा परिणाम होऊन अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विजेच्या लपंडावात अनेक ठिकाणी विजेच्या संयंत्रात बिघाड होत असून, सदर बिघाड झाल्यानंतर वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने अनेक गावे तीन-तीन चार-चार तास अंधारात राहत आहे. अनेक गावांमध्ये विद्युतपुरवठा करणार्‍या तारा जीर्ण झाल्या असून, अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीत लोंबकळत आहे. रोहित्रांचीही दुरवस्था झाली आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही सदरची दुरुस्ती होत नाही तरी सदराची दुरुस्ती व्हावी तसेच भारनियमन कमी करून वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार धनराज महाले यांनी दिला आहे. निकवेल : बागलाण तालुक्यातील निकवेल येथे विजेचा लपंडाव सुरू झाल्याने शेतकरी हैराण झालेले आहेत. निकवेलसह परिसरातील गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ऐन कडकडीत उन्हाळ्यात भरदुपारी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. परिणामी या भागातील ग्रामस्थांना वीजपुरवठा नसल्याने फॅन, कूलरची हवा मिळणेदेखील दुरापास्त झालेले आहे. अधिक उष्णतेने एककीडे ग्रामस्थ हैराण झालेले असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे अधिक भरडला जात आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडे विजेसंदर्भात माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असतात. डांगसौंदाणे येथील कार्यालयात चौकशी केली असता सटाणा येथून थेट वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची कारणे दिली जातात. यामुळे सुरळीत होणे आमच्या हातात नसल्याने सांगून हात वर केले जातात. निकवेल येथे सिंंगल फेज योजना असतानादेखील विद्युतपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. यात तातडीने सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समितीचे सदस्य भास्कर बच्छाव, भिका वाघ, संतोष जाधव, उपसरपंच दीपक वाघ, मुरलीधर वाघ आदिंनी इशारा दिला आहे. (वार्ताहर)