शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
3
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
4
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
5
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
6
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
7
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
8
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
9
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
10
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
11
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
12
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
13
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
14
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
15
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
17
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
18
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
19
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
20
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप

आदिवासी उपयोजनेसाठी ५२ कोटींचा वाढीव निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:17 IST

नाशिक : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये नाशिक जिल्ह्यात सात आदिवासी तालुके आहेत. त्यामुळे या तालुक्यांमध्ये रस्ते विकास, वीज पुरवठा, ...

नाशिक : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये नाशिक जिल्ह्यात सात आदिवासी तालुके आहेत. त्यामुळे या तालुक्यांमध्ये रस्ते विकास, वीज पुरवठा, अंगणवाडी बांधकाम, अमृत आहार योजना, पशुसंवर्धन अशी विविध कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने वाढीव निधीची करण्यात आलेली मागणी आदिवासी विकास मंत्र्यांनी मान्य केल्याने जिल्ह्याला ५२ कोटींचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे आदिवासी उपयोजनेसाठी एकूण ३५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना २०२१-२२ या राज्यस्तरीय बैठकीत पालकमंत्री भुजबळ जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहातून दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाची झाले होते. यावेळी मुंबई येथून आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी तर जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्हा मोठा असून त्यामध्ये सात आदिवासी तालुके आहेत. या तालुक्यांमध्ये रस्ते विकास, वीज पुरवठा, अंगणवाडी बांधकाम, अमृत आहार योजना, पशुसंवर्धन अशी विविध कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने आदिवासी उपयोजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी वाढीव निधी मिळण्याबाबत आदिवासी विकास मंत्री पाडवी यांच्याकडे मागणी केली. ही मागणी पाडवी यांनी मान्य केली त्यामुळे ५२ कोटींचा जादा निधी मिळणार आहे. गतवर्षी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत २९८ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने २०२१-२२ या वर्षासाठी ५२ कोटी रुपये वाढीव निधी म्हणजेच ३५० कोटी रुपयांच्या निधी मागणीस मान्यता मिळाली.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा वार्षिक उपयोजनेंतर्गत होणाऱ्या कामांसाठी कामनिहाय आवश्यक असणाऱ्या वाढीव निधीची माहितीचे सादरीकरण केले.

--कोट--

आदिवासी भागातील अपूर्ण असलेली कामे पूर्ण करून घेण्यात येत आहेत. २०२१-२२ यावर्षामध्ये आदिवासी उपयोजनेंर्गत निधी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून निधी खर्चाबाबतचे अचूक नियोजन करण्यात येईल. जेणेकरून मानवी निर्देशांकामध्ये जिल्ह्याची प्रगती होण्यासाठी मदत होईल- छगन भुजबळ, पालकमंत्री.