शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आनंदी सहवास संस्थेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:04 IST

सामाजिक बांधिलकीतून आनंदी सहवास या संस्थेच्या वतीने आदिवासी दुर्गम पाड्यांवरील गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य मदतीचा उपक्रम राबवित त्यांना शिक्षणासाठी सहाय्य केले आहे. आनंदी सहवास संस्थेच्या वतीने दिंडोरी, सुरगाणा तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यावरील सुमारे २०० मुलांना दत्तक योजनेत वह्या, पुस्तके व शालेय बॅग यांचे वाटप करण्यात आले.

नाशिक : सामाजिक बांधिलकीतून आनंदी सहवास या संस्थेच्या वतीने आदिवासी दुर्गम पाड्यांवरील गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य मदतीचा उपक्रम राबवित त्यांना शिक्षणासाठी सहाय्य केले आहे.आनंदी सहवास संस्थेच्या वतीने दिंडोरी, सुरगाणा तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यावरील सुमारे २०० मुलांना दत्तक योजनेत वह्या, पुस्तके व शालेय बॅग यांचे वाटप करण्यात आले. आनंदी सहवास संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमात यंदा आदिवासी भागातील १६१ आणि नाशिक शहरातील ४० मुलांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च करण्यात येत आहे. या संस्थेच्या वतीने नवीन शैक्षणिक साहित्य खरेदीबरोबरच जी मुले वरच्या वर्गात गेल्यावर आपली चांगल्या स्थितीतील पुस्तके व शालेय बॅग (दप्तर) वापरत नाहीत, अशा इंग्रजी शाळेतील मुलांकडून सदर बॅग्ज संकलित करून त्या आदिवासी भागातील गरजू मुलांना देण्यात आल्या. यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी देवसाने, शिंदेपाडा, मोरवाणपाडा, चरणपाडा, उपळीपाडा या आदिवासी भागात जाऊन शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविला. त्याचप्रमाणे मेरी येथील जोशी आठवले या शाळेतील ४० मुलांना दत्तक घेऊन विविध शैक्षणिक साहित्याची मदत केली. या उपक्रमात आनंद सहवास संस्थेचे मंजूषा सोनार, मयूर मराठे, प्रतिभा सोनार, हेमंत पवार, रोहन विसपुते, सागर सावरगावकर, हेमंत राजगुरु, शीतल परब, मुकेश चव्हाण, मुक्तार कुरेशी, अजित थोरात, किशोर सोनार आदि सहभागी झाले होते.मुलांचे चेहरे आनंदाने फुललेआदिवासी भागातील मुले पाड्यावरून लांब अंतरावर पायपीट करीत शाळेत जातात. त्यांच्याकडे वह्या पुस्तके ठेवल्यासाठी कापडी पिशवी असते. काही विद्यार्थ्यांकडे मात्र कापडी पिशवीदेखील नसल्याने वह्या पुस्तके पावसात भिजतात. हातातून पाण्यात किंवा चिखलात पडतात. मात्र या मुलांना स्कूल बॅग्ज (दप्तर) दिल्याने त्यांच्या चेहºयावर आनंद दिसून आला, असे संस्थेचे प्रमुख किरण सोनार यांनी सांगितले.