शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कारवाई

By admin | Updated: April 20, 2017 00:45 IST

इंदिरानगर : प्रभाग २३, ३०, ३१ मधील चेतनानगर परिसराचा पाणीपुरवठा येत्या ४८ तासांत सुरळीत करा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, असे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले.

 इंदिरानगर : प्रभाग २३, ३०, ३१ मधील चेतनानगर परिसराचा पाणीपुरवठा येत्या ४८ तासांत सुरळीत करा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, असे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले. या परिसरातील कृत्रिम पाणीटंचाईसंदर्भात महापौर दालनात प्रभागाचे नगरसेवक आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी नगरसेवकांनी इंदिरानगर, राजीवनगर, श्रद्धाविहार कॉलनी, कमोदनगर, परबनगर, वैभव कॉलनीसह प्रभाग २३, ३०, ३१ चेतनानगर परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गतवर्षी गंगापूर धरणात अत्यल्प जलसाठा असतानाही पाणीपुरवठा सुरळीत होता. यंदा धरणात मुबलक जलसाठा असतानाही वितरण व तांत्रिक विभाग यांच्यातील नियोजनाअभावी कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला आम्हा नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे असे नगरसेवक सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, श्याम बडोदे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा, पुष्पा आव्हाड यांनी बैठकीत महापौर यांना सांगितले.यावेळी महापौरांनी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून चढ्ढापार्क व कलानगर येथे जलकुंभ मंजूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच दर आठवड्यास विभागीय अधिकारी व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठ्या संदर्भात माहिती कळविणे, अभियंत्यांनी स्वत: जलकुंभास भेट देऊन जलकुंभात पाणी किती आहे याची माहिती देणे, कोणतेही कारण न देता याप्रश्नी गांभीर्याने काम करावे अशा सूचना करत येत्या ४८ तासांत पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा कारवाईस सामोरे जा, असे आदेश यावेळी दिले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे धर्माधिकारी, चव्हाणके, धारणकर, बच्छाव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)इंदिरानगर परिसरातील लोकप्रतिनिधींनी महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन पाणीपुरवठासंबंधी समस्या मांडल्या.