शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कारवाई

By admin | Updated: April 20, 2017 00:45 IST

इंदिरानगर : प्रभाग २३, ३०, ३१ मधील चेतनानगर परिसराचा पाणीपुरवठा येत्या ४८ तासांत सुरळीत करा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, असे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले.

 इंदिरानगर : प्रभाग २३, ३०, ३१ मधील चेतनानगर परिसराचा पाणीपुरवठा येत्या ४८ तासांत सुरळीत करा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, असे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले. या परिसरातील कृत्रिम पाणीटंचाईसंदर्भात महापौर दालनात प्रभागाचे नगरसेवक आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी नगरसेवकांनी इंदिरानगर, राजीवनगर, श्रद्धाविहार कॉलनी, कमोदनगर, परबनगर, वैभव कॉलनीसह प्रभाग २३, ३०, ३१ चेतनानगर परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गतवर्षी गंगापूर धरणात अत्यल्प जलसाठा असतानाही पाणीपुरवठा सुरळीत होता. यंदा धरणात मुबलक जलसाठा असतानाही वितरण व तांत्रिक विभाग यांच्यातील नियोजनाअभावी कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला आम्हा नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे असे नगरसेवक सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, श्याम बडोदे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा, पुष्पा आव्हाड यांनी बैठकीत महापौर यांना सांगितले.यावेळी महापौरांनी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून चढ्ढापार्क व कलानगर येथे जलकुंभ मंजूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच दर आठवड्यास विभागीय अधिकारी व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठ्या संदर्भात माहिती कळविणे, अभियंत्यांनी स्वत: जलकुंभास भेट देऊन जलकुंभात पाणी किती आहे याची माहिती देणे, कोणतेही कारण न देता याप्रश्नी गांभीर्याने काम करावे अशा सूचना करत येत्या ४८ तासांत पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा कारवाईस सामोरे जा, असे आदेश यावेळी दिले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे धर्माधिकारी, चव्हाणके, धारणकर, बच्छाव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)इंदिरानगर परिसरातील लोकप्रतिनिधींनी महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन पाणीपुरवठासंबंधी समस्या मांडल्या.