शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नियमांची पायमल्ली करणाऱ्या ५३ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:14 IST

पंचवटी : वाढते अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहने चालविताना वाहनचालकांनी सर्व रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करावे यासाठी प्रादेशिक परिवहन ...

पंचवटी : वाढते अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहने चालविताना वाहनचालकांनी सर्व रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करावे यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. वायुवेग पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जात असून यात प्रामुख्याने क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या ५३ वाहनांवर कारवाई करून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली आहे.

क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणे तसेच अन्य वाहतूक नियमांचे पालन न करणे यासाठी जवळपास ४५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या कारवाईच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुमारे ४ कोटी १ लाख रुपये दंड वसूल केला असून यापुढे अशीच कारवाई मोहीम सुरू राहणार आहे. तसेच रस्ता सुरक्षितेच्या दृष्टीने विविध प्रकारच्या गुन्ह्यात नियमांचे उल्लंघन झाल्यास वाहन चालकाचे लायसन्स निलंबनासंबंधी कारवाईसाठी पोलीस ठाण्यात प्रस्ताव सादर केले जातात. धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, अनुज्ञेय भार क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, वाहन चालविताना अंमली पदार्थ सेवन करणे, वाहन चालविताना भ्रमणध्वनी वापर करणे, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, अशा गुन्ह्यांसाठी ९० दिवसांकरिता चालकाचे लायसन्स निलंबित करण्यात येते. कार्यालयाने केलेल्या केस पोलीस विभागाकडून प्राप्त प्रस्ताव संबंधित प्रकरणावर कार्यालयाने लायसन्स निलंबनाची प्रक्रिया होऊन २२१ लायसन्स धारकांचे लायसन्स ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.