शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नोटाबंदीवर घाईगर्दीचा आरोप चुकीचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:19 IST

पंतप्रधानांनी गेल्या वर्षी कोणत्याही पूर्वतयारीशिवाय नोटाबंदीचा निर्णय घाईघाईने घेतला असल्याची टीका विरोधक करीत असले तरी हा निर्णय पूर्वतयारीनेच होता. त्यामुळेच सहा महिन्यांत १७ लाख कोटी रुपयांचे चलन बाजारात आणले गेले, असे मत अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले.

नाशिक : पंतप्रधानांनी गेल्या वर्षी कोणत्याही पूर्वतयारीशिवाय नोटाबंदीचा निर्णय घाईघाईने घेतला असल्याची टीका विरोधक करीत असले तरी हा निर्णय पूर्वतयारीनेच होता. त्यामुळेच सहा महिन्यांत १७ लाख कोटी रुपयांचे चलन बाजारात आणले गेले, असे मत अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले.रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने नोटांबदी वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला गंजमाळ येथील सभागृहात गोविलकर यांचे ‘निश्चलनीकरणाआधी आणि नंतरची आर्थिक स्थिती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, मनीषा चिंधडे, हेमंत मराठे, शिल्पा येवला आदी मान्यवर उपस्थित होते. नोटाबंदीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यात नोटाबंदीनंतर चलनात असलेले सुमारे तीन ते साडेतीन लाख कोटी रुपयांचे काळे धन बॅँकेत जमा होणार नाही अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र संपूर्ण रक्कम जमा झाली. या प्रकारामागे रिझर्व्ह आणि स्थानिक बॅँकेच्या काही उणिवा कारणीभूत आहेत, असे सांगून गोविलकर म्हणाले की, एकूण चलनातील ९९ टक्के नोटा बॅँकेत जमा झाल्या. एक टक्का जमा झाल्या नाहीत. ही एक टक्का रक्कम छोटी नसून १५ हजार पाचशे कोटी रुपये इतकी ही रक्कम असल्याचे ते म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय घाईत घेतला नव्हता. उलट पूर्वतयारी असल्याने सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात चलन उपलब्ध झाले, तसेच चुकीचे व्यवहार करणाºया सुमारे पन्नास लाख व्यक्तींना नोटिसा देता आल्या, असेही ते म्हणाले.