शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मान्यताप्राप्तएसटी बॅँक निवडणूक : भ्रष्टाचाराच्या आरोपांचा फुटला भोपळा

By admin | Updated: June 4, 2015 00:33 IST

संघटनेला रोखण्यात अपयश

नाशिक : परिवहन महामंडळ कर्मचारी को-आॅप. बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा एकदा मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेने सत्ता काबीज केल्यानंतर त्यांना विरोध करणाऱ्या जवळपास सर्वच पक्षप्रणीत पॅनल्सचा दारुण पराभव झाला आणि सत्ताधारी संचालक मंडळावर केलेल्या सर्वच आरोपांचा भोपळा फुटला. बॅँकेवर यापूर्वी जरी मान्यताप्राप्त संघटनेचीच सत्ता असली, तरी त्यात काही इतर संघटनांचेही प्रतिनिधी होते. यंदा मात्र त्या सर्वांनाच मतदारांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे.बॅँकेवर जरी १५ वर्षांपासून मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनाप्रणीत पॅनलची सत्ता असली तरी यंदा झालेली निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी होती. ही निवडणूक राज्यस्तरीय असल्याने संपूर्ण राज्यातील मतदारांना त्यात मतदान करायचे होते. त्यामुळे त्या ताकदीचे उमेदवार आणि निवडणुकीतील मुद्दे गरजेचे होते. परंतु तसे झालेच नाही. कारण सर्वच विरोधी पॅनलनी केवळ सत्ताधारी संचालक मंडळावर आरोप करण्यापलीकडे इतर मुद्दे प्रभावीपणे मांडलेच नाहीत. नव्या पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत यंदा सर्वच कामगार संघटनांचे पॅनल उभे करण्यात आले होते. प्रत्येकी १५ सर्वसाधारण आणि ४ राखीव असे ७६ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीसाठी प्रथमच चार पॅनल रिंगणात उतरले होते. त्यात मनसेप्रणीत कामगार संघटनेने स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. एसटी वर्कर्स कॉँग्रेसच्या जयप्रकाश छाजेड प्रणीत क्रांती पॅनल, सत्ताधारी मान्यताप्राप्त संघटना आणि शिवसेनाप्रणीत एमएमके, कास्ट्राईब, इंटक (गोविंदराव आदिक), भाई जगताप यांची कृती समिती करून तयार झालेले असे चार पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात होते.इंटकने सत्ताधारी संचालक मंडळावर अनेक आरोप करून वातावरणनिर्मिती केली खरी; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यांनाही केवळ १८ हजार पाचशे मतांवरच समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत इंटकचे पाच संचालक निवडून आले होते. त्यावेळी जिल्हास्तरावर झालेल्या निवडणुकीचा फायदा इंटकला झाला होता. परंतु राज्यस्तरावर त्यांची ताकद कमी पडली आणि इंटकच्या एकाही उमेदवाराला मतदारांनी निवडून दिले नाही. मागच्या पंचवार्षिक काळात इंटक- ५, सेना- २ आणि मजदूर युनियन- १ असे संचालक बॅँकेवर असताना, त्या संचालकांना त्यांच्या पॅनलसाठी भोपळाही फोडता आला नाही म्हणजे ते कमी पडले असे चित्र निर्माण होते. निवडणुकीच्या सुरुवातीला मान्यताप्राप्त संघटना सोडता इतर पक्षांची भूमिका शेवटपर्यंत स्थिर नव्हती. सत्ताधारी पॅनलला विरोध करायचा इतकेच काय ते सर्वांमध्ये साम्य होते. या एकाच समान साखळीच्या धाग्यात जर विरोधक एकत्र आले असते, तर त्यांना किमान काही जागांवर तरी विजय मिळाला असता. परंतु प्रत्येक पॅनलने आपल्याला फायदा होईल अशी वल्गना करीत एकत्र यायला नकार दिल्याने शेवटी व्हायचे तेच झाले. आता बॅँकेत राहून विरोध करायला त्यांचा एकही प्रतिनिधी उरला नाही. त्यामुळे काय विरोध करायचा तो पुढच्या निवडणुकीलाच हाच संदेश मतदारांनी विरोधकांना दिला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. (प्रतिनिधी)