शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

अपघाताने स्मृती गेली, प्रबोधनाची दृष्टी दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:16 IST

आपल्यावर ओढावलेला अपघाताचा प्रसंग इतरांवर येऊ नये आणि आपल्यासारखे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, या अस्वस्थ करणाºया विचाराने तिशीतला संजयकुमार हा युवक गेल्या दहा वर्षांपासून रस्ता सुरक्षा जनजागृतीचे व्रत घेत अवघा महाराष्टÑ पिंजत आहे. कारण एका अपघातात तो मृत्यूच्या दाढेत ओढावला गेला होता. ही वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी त्याची धडपड सुरू आहे.

अझहर शेख ।नाशिक : आपल्यावर ओढावलेला अपघाताचा प्रसंग इतरांवर येऊ नये आणि आपल्यासारखे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, या अस्वस्थ करणाºया विचाराने तिशीतला संजयकुमार हा युवक गेल्या दहा वर्षांपासून रस्ता सुरक्षा जनजागृतीचे व्रत घेत अवघा महाराष्टÑ पिंजत आहे. कारण एका अपघातात तो मृत्यूच्या दाढेत ओढावला गेला होता. ही वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी त्याची धडपड सुरू आहे. नागपूर येथील संजयकुमार भय्याराम गुप्ता बी.फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून औषधाच्या एका कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून नोकरी करत होता. घरात आई, दोन बहिणी असे त्याचे कुटुंब. सर्व काही सुरळीत सुरू होते. वयाची तिशी गाठत असलेला हा तरुण विवाहाची स्वप्ने रंगवत संसार थाटण्याच्या तयारीत होता; मात्र नियतीने त्याच्याबाबत काही वेगळेच मांडून ठेवले होते. दिनचर्येनुसार तो दुचाकी घेऊन विनाहेल्मेट निघाला. अनवधानाने दुचाकीचे साइड स्टॅँड खुले राहिले अन् हे अपघाताचे मुख्य कारण ठरले. डोक्याला जबर मार लागला अन् रक्तस्त्रावही झाला. तासभर पडून असताना कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. त्यानंतर काही संवेदनशील नागरिकांनी त्यांना रुग्णालयात पोहचविले. डोक्याला जबर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने जीवनाची आशा धुसर झाली होती. गुप्ता ‘कोमा’त गेले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली; मात्र धोका टळण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागला. धोका टळला खरा; मात्र त्यांना पक्षाघाताचा आघात झाला. यामुळे त्यांना अपंगत्व आले. संपूर्ण शरीर अपंग होऊन वाचा शुद्धीही हरपली. केवळ हृदयाचे ठोके सुरू होते. आईने मोठ्या मेहनतीने सुशुश्रा व उपचार करून त्यांना दोन वर्षानंतर स्वत:च्या पायावर उभे केले. आजही त्यांचा आवाजाचा स्वर कमी येतो तसेच एकसारखे काही मिनिटे जरी बोलले तरी घशात वेदना होतात. चालताना पायही लटपटतात तरीदेखील गुप्ता यांनी जिद्दीने समाजामध्ये असलेले वाहतूक नियमाविषयीची उदासिनता दूर करण्याचे व्रत घेतले आहे.देश अपघातमुक्त व्हावा हेच स्वप्नगुप्ता दीड वर्षे अंथरुणाला खिळून राहिले. आईने सुश्रुषा केली. जगण्याची आशा दाखवून आत्मविश्वास उंचावला. यामुळे गुप्ता आपल्या पायावर पुन्हा उठून उभे राहिले; मात्र आयुष्याच्या एक तप विसरून...जणू त्यांचा एक नवा जन्मच झाला... आई व बहिणींनी पुन्हा ‘बाराखडी’ शिकविली. बोलण्यापासून ते खाण्यापर्यंत सर्व काही धडे दिले. कोमामधून बाहेर पडल्यानंतर त्यांना अस्वस्थ करणाºया विचाराने समाजप्रबोधनाची दृष्टी दिली. या दृष्टीतून त्यांनी अपघातमुक्त देशाचे स्वप्न बघितले अन् रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम साक्षरता मिशन हाती घेतले. रस्ता सुरक्षेविषयी समाजप्रबोधन ते स्वखर्चाने करीत आहे.