शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताने स्मृती गेली, प्रबोधनाची दृष्टी दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:16 IST

आपल्यावर ओढावलेला अपघाताचा प्रसंग इतरांवर येऊ नये आणि आपल्यासारखे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, या अस्वस्थ करणाºया विचाराने तिशीतला संजयकुमार हा युवक गेल्या दहा वर्षांपासून रस्ता सुरक्षा जनजागृतीचे व्रत घेत अवघा महाराष्टÑ पिंजत आहे. कारण एका अपघातात तो मृत्यूच्या दाढेत ओढावला गेला होता. ही वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी त्याची धडपड सुरू आहे.

अझहर शेख ।नाशिक : आपल्यावर ओढावलेला अपघाताचा प्रसंग इतरांवर येऊ नये आणि आपल्यासारखे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, या अस्वस्थ करणाºया विचाराने तिशीतला संजयकुमार हा युवक गेल्या दहा वर्षांपासून रस्ता सुरक्षा जनजागृतीचे व्रत घेत अवघा महाराष्टÑ पिंजत आहे. कारण एका अपघातात तो मृत्यूच्या दाढेत ओढावला गेला होता. ही वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी त्याची धडपड सुरू आहे. नागपूर येथील संजयकुमार भय्याराम गुप्ता बी.फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून औषधाच्या एका कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून नोकरी करत होता. घरात आई, दोन बहिणी असे त्याचे कुटुंब. सर्व काही सुरळीत सुरू होते. वयाची तिशी गाठत असलेला हा तरुण विवाहाची स्वप्ने रंगवत संसार थाटण्याच्या तयारीत होता; मात्र नियतीने त्याच्याबाबत काही वेगळेच मांडून ठेवले होते. दिनचर्येनुसार तो दुचाकी घेऊन विनाहेल्मेट निघाला. अनवधानाने दुचाकीचे साइड स्टॅँड खुले राहिले अन् हे अपघाताचे मुख्य कारण ठरले. डोक्याला जबर मार लागला अन् रक्तस्त्रावही झाला. तासभर पडून असताना कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. त्यानंतर काही संवेदनशील नागरिकांनी त्यांना रुग्णालयात पोहचविले. डोक्याला जबर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने जीवनाची आशा धुसर झाली होती. गुप्ता ‘कोमा’त गेले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली; मात्र धोका टळण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागला. धोका टळला खरा; मात्र त्यांना पक्षाघाताचा आघात झाला. यामुळे त्यांना अपंगत्व आले. संपूर्ण शरीर अपंग होऊन वाचा शुद्धीही हरपली. केवळ हृदयाचे ठोके सुरू होते. आईने मोठ्या मेहनतीने सुशुश्रा व उपचार करून त्यांना दोन वर्षानंतर स्वत:च्या पायावर उभे केले. आजही त्यांचा आवाजाचा स्वर कमी येतो तसेच एकसारखे काही मिनिटे जरी बोलले तरी घशात वेदना होतात. चालताना पायही लटपटतात तरीदेखील गुप्ता यांनी जिद्दीने समाजामध्ये असलेले वाहतूक नियमाविषयीची उदासिनता दूर करण्याचे व्रत घेतले आहे.देश अपघातमुक्त व्हावा हेच स्वप्नगुप्ता दीड वर्षे अंथरुणाला खिळून राहिले. आईने सुश्रुषा केली. जगण्याची आशा दाखवून आत्मविश्वास उंचावला. यामुळे गुप्ता आपल्या पायावर पुन्हा उठून उभे राहिले; मात्र आयुष्याच्या एक तप विसरून...जणू त्यांचा एक नवा जन्मच झाला... आई व बहिणींनी पुन्हा ‘बाराखडी’ शिकविली. बोलण्यापासून ते खाण्यापर्यंत सर्व काही धडे दिले. कोमामधून बाहेर पडल्यानंतर त्यांना अस्वस्थ करणाºया विचाराने समाजप्रबोधनाची दृष्टी दिली. या दृष्टीतून त्यांनी अपघातमुक्त देशाचे स्वप्न बघितले अन् रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम साक्षरता मिशन हाती घेतले. रस्ता सुरक्षेविषयी समाजप्रबोधन ते स्वखर्चाने करीत आहे.